पाणीपुरवठा मंडळातील कर्मचाऱयांचे निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
पाणीपुरवठा मंडळामध्ये गेल्या 20 ते 25 वर्षांपासून एलएनटी या कंपनीच्या माध्यमातून आम्ही काम करत होतो. मात्र, आता या कंपनीचा टेंडर घेऊन दुसऱया कंपनीला देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यामुळे आम्ही अडचणीत आलो असून दुसऱया कंपनीला टेंडर द्यायचे असेल तर आम्हाला कायमस्वरुपी नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी पाणीपुरवठा कर्मचाऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करत आहे. शहरासह हिडकल डॅम, तुम्मरगुद्दी, राकसकोप, बसवनकोळ्ळ, लक्ष्मीटेक या परिसरात आम्ही काम करत आहे. आम्ही जवळपास 410 कर्मचारी आहे. मात्र, आम्हाला अद्याप कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाहीत.
आता असलेल्या कंपनीकडील जबाबदारी दुसऱया कंपनीकडे देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. मात्र, आम्हाला त्याबाबत कोणतीच माहिती दिली जात नाही. आमची कोणतीही तक्रार नाही. मात्र, आम्हालाच कामावर कायमस्वरुपी सामावून घेण्याबाबत लेखी द्यावे, अशी मागणी केली. जोपर्यंत लेखी देण्यात येत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही. 7 फेबुवारीपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुनीता यळ्ळूरकर, मेघा साळुंखे, वीणा कोलकार, सुमित मेत्री, नागराज कगटी, विश्वनाथ पाटील, श्वेता कांबळे, नागराज जक्कण्णावर, दयानंद कांबळे, विशाल जाधव, प्रमोद चौगुले, मुज्जमील पटेल, अनिल दोडमनी, प्रवीण हिरेमठ, सन्नाप्पा हलभावी, संजीव तिप्पण्णावर, केन्नाप्पा बडकण्णावर, श्रीकांत चौगुले, सुनील बडगेर आदी उपस्थित होते.