दोडामार्ग- वार्ताहार-
आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना सरळ सेवा भरती प्रक्रियेत प्राधान्य मिळण्याची मागणी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी महासंघाच्या सिंधुदुर्ग शाखेने एका निवेदनाद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जि. प. च्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेऊन या संदर्भात हे निवेदन देण्यात आले आहे. यासंदर्भात येत्या 15 ऑगस्ट रोजी या अभियानातील शंभर अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागण्या व व्यथा मांडण्यासाठी तसेच चालु भरती प्रक्रियेत प्राधान्याबाबत व मंत्रिस्तरीय समितीच्या शिफारसीनुसार सकारात्मक निर्णय होण्याकरिता विनंती करणार आहोत असेही या निवेदनात स्पष्ट केले आहे.