ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेश सरकारने विशेष सुरक्षा दलाची स्थापना केली आहे. या सुरक्षा दलाला विना वॉरंटतपासणी करणे आणि अटक करण्याचे अधिकार दिले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.
हे विशेष सुरक्षा दल उत्तरप्रदेशातील विमानतळे, मेट्रो, तीर्थक्षेत्र, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालये, प्रशासकीय कार्यालय, बँक आणि वित्तीय संस्थांच्या सुरक्षेसाठी तैनात असेल. या दलातील जवान न्यायाधीशांच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीची तपासणी करू शकतो अथवा त्याला अटक करू शकतो.
या दलाच्या पहिल्या टप्प्यात 5 बटालियनची स्थापना केली जाईल. त्यात 1913 नवीन पदांची भरती करण्यात येईल. त्यासाठी 1700 कोटी रुपयांची रक्कम अंदाजित आहे. त्यामध्ये या जवानांचे वेतन, भत्ते आणि अन्य सुविधांचा समावेश आहे.