उदगाव/वार्ताहर
देशव्यापी कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक सहभाग नोंदवत चक्काजाम केला. उदगाव तालुका शिरोळ येथील अंकली टोलनाक्याजवळ सकाळी साडेअकराच्या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तासभर रस्त्यामध्ये ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तासभर झालेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही जरी महाराष्ट्र राज्याच्या सत्तेत सामील असली तरीही जर शेतकरी हिताविरुद्ध शासन धोरण राबवत असेल तर विरुद्ध भूमिका घेणारच व रस्त्यावरची लढाई लढणार अशा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला. शेतकयांना सरसकट कर्जमाफी देत त्यांचा सातबारा कोरा व्हावा तसेच महापुरात नुकसान झालेल्या शेतकयांच्या इलेक्ट्रिक मोटारीवर ट्रान्सफॉर्मर यांची नुकसानभरपाई तसेच शेतमजूर असणाया अनेक ग्रामीण भागातील महिलांनी मायक्रो फायनान्स कडून घेतलेले थकीत कर्ज माफ व्हावे ही मागणी शासन दरबारी आपली आहे. देशातील 265 शेतकरी संघटनांनी या बंदमध्ये सामील होत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणास कडाडून विरोध केला आहे
या आंदोलनास महाराष्ट्रातील सर्वच भागातून उस्फूर्तपणे प्रतिसाद लाभला असून तीन पायांची शर्यत खेळणाया राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे की सत्य सगळं काही आलबेल नाही जर तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला घरी धरत असाल तर तुमच्या बुडा खालचा खुर्च्या खाली केल्याशिवाय ही जनता गप्प बसणार नाही असाही इशारा त्यांनी यावेळी दिला. केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणामुळे या वर्गाचे मोठे नुकसान होत आहे आयात-निर्यात बाबत सरकारने चुकीचे निर्णय घेतल्यामुळे मोठे नुकसान होत आहे त्याचबरोबर औद्योगिक वसाहतीमधील छोटे छोटे उद्योगधंदे बंद पडल्यामुळे बेरोजगाराच्या समस्या निर्माण होत आहेत. शेतकयांच्या आत्महत्या वाढत असल्याने आता सामान्य माणसाची सहनशीलता संपत आले आहे असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, महिला व विवाह आघाडी च्या विविध पदाधिकारी यांच्याबरोबर कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान तीन रुग्णवाहिका आले असता त्यांना आंदोलनकर्त्यांनी मार्गस्थ केले.