प्रतिनिधी/ सातारा
सध्या बाधितांची संख्या वाढल्याने ऑक्सिनजची मागणीही वाढली आहे. सातारा व कोल्हापूर जिल्हय़ात वातावरण खूप पॅनिक झाले आहे. अशातच साताऱयानजिक कोल्हापूरचा उल्लेख करुन आलेला ऑक्सिजन टँकर सातारा व कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱयांमध्ये तो आमचा असल्याचे सांगत वाद पेटला. पण नंतर पुरवठा करणाऱया यंत्रणेकडून तो टँकर सातारासाठी असल्याचा खुलासा झाल्यानंतर टँकर सातारा एमआयडीसीतील भारत कंपनी इंडस्ट्रीज या डिस्ट्रीब्युटच्या प्लांटकडे रवाना झाला.
सायंकाळी पेण मुंबईहून ऑक्सिजन भरुन आलेला टँकर वाढे फाटय़ावर साडे बारा टन ऑक्सिजनसह पोलीस बंदोबस्तात दाखल झाला. मात्र, साताऱयासाठी की कोल्हापूर जिल्हय़ासाठी असा वाद टँकरच्या चालकामुळे निर्माण झाला. कारण टँकरमालकाने तो टँकर कोल्हापूरला घेवून जा, असे चालकाला सांगितले होते. आणि तो चालक मी मालकाचे ऐकणार असे म्हणू लागला. त्यामुळे मग यावरुन सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई तो आमचा असल्याचे सांगत एकमेकांना भिडले. मग पोलीस बंदोबस्तात ऑक्सिजन टँकर हायवेवरच थांबवण्यात आला.
ज्या टँकरवरुन वाद निर्माण झाला तो टँकर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा पोलीस दलाचे खास पोलीस एस्कॉर्ट पथक देवून भरुन आणण्यासाठी पाठवला होता. तो टँकर घेवून सातारा पोलीस दलाचे एस्कॉर्ट दाखलही झाले होते. त्यामुळे शेखर सिंह यांनी हा सातारा जिल्हय़ासाठीचा टँकर असून तो कोल्हापूरला पाठवणार नाही, अशी भूमिका घेतली. तर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी देसाई यांनी कोल्हापूर जिल्हय़ासाठी असल्याची भूमिका घेतली होती.
ऑक्सिजनसाठी किती मारामारी सुरु आहे हे या घटनेवरुन समोर आले. मात्र, तोपर्यंत ऑक्सिजन टँकर साताऱयासाठी आहे व कोल्हापूरसाठी येत असलेल्या टँकर चालकाशी संपर्क होत नसल्याने हा वाद थोडा वाढला होता. मात्र, आणखी एक टँकर पाठीमागून येत असल्याचा खुलासा संबंधित यंत्रणेने केल्यानंतर आणि कोल्हापूरकडे जाणाऱया टँकरचालकाशी संपर्क झाल्यावर हा तिढा सुटला. मात्र, तोपर्यंत दोन्ही जिल्हाधिकारी एकमेकांना भिडल्याचा किस्सा घडून गेला.
रात्री 7.30 च्या दरम्यान, वाढेफाटय़ावरुन हा टँकर सातारा एमआयडीसीतील भारत कंपनी इंडस्ट्रीज या डिस्ट्रीब्युटच्या प्लांटकडे रवाना वळवण्यात आला. रात्री उशिरापर्यंत तो भरण्याचे काम सुरु होते. त्यामुळे जिल्हय़ासाठी साडेबारा टन ऑक्सिजन उपलब्ध झाला असून त्यामुळे आवश्यकता असलेल्या बाधित रुग्णांसाठी तो मोठा दिलासा ठरला आहे. दरम्यान, रात्री उशिरा कोल्हापूर जिल्हय़ासाठी असलेला ऑक्सिजन टँकर रवाना झाल्याने या ऑक्सिजन टँकर कोणत्या जिल्हय़ाचा या वादावर अखेर पडदा पडला.
चौकट
टँकर आल्याचा मोठा दिलासा
जिल्हय़ात सध्या बाधितांची संख्या वाढल्याने ऑक्सिजनची मागणी वाढलेली आहे. सातारा जिल्हय़ात तर काही ठिकाणी सायंकाळपर्यंत तर काही ठिकाणी पहाटेपर्यंत पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याची माहिती मिळत आहे. जर टँकर वेळेवर आला नसता तर ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासला असता. मात्र, टँकर वेळेत आला, थोडा गैरसमजातून वाद झाला पण आता साडेबारा टन ऑक्सिजन उपलब्ध झाल्याने मोठा दिलासा लाभला आहे.