कसबा बीड / प्रतिनिधी
शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये कर्जमाफी देण्यात द्यावी यासाठी कसबा बीड ते कलेक्टर ऑफिस 1 नोव्हेंबरला पायी दिंडी आंदोलन आयोजित केले असुन केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना न्याय देणे गरजेचे आहे ,असे प्रतिपादन शेतकरी आंदोलक मुकुंद पाटील यांनी केले .
कसबा बीड येथे पत्रकाद्वारे माहिती देताना पाटील यांनी सर्वसामान्य शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यासाठी ईमेल द्वारे आपण मुख्यमंत्री व प्रशासकांना वेळोवेळी माहिती दिल्याचे सांगितले . त्याचे प्रत्युत्तरही आपणास ईमेल द्वारे मिळाली असली तरी शासकीय धोरणामुळे त्यात विलंब होत आहे असंही ते म्हणाले.
अधिक माहिती देताना पुढे ते म्हणाले कसबा बीड ते मंत्रालय पायी दिंडी आंदोलन नियोजित होते पण कोरोना महामारीमुळे ते कसबा बीड ते कोल्हापूर कलेक्टर ऑफिस असे नियोजीत केले आहे .शेतकरी अडाणी नाही तर शासनप्रणाली चुकीचे आहे. विक्री व्यवस्थेत बदल करुन शेतीमालास योग्य हमीभाव मिळावा व व्यापारी बिले वेळेत मिळावी असे झाल्यास शेतकरी अडचणीत येऊ शकत नाही.शेतकरी कर्जमाफीसह पिक कर्ज, शेतीसाठी 24 तास वीज, महिला बचत गटाच्या कृषीकर्ज माफ, पेट्रोल,डिझेल,गॅस आणि रासायनिक खते यांचे दर कमी करावेत ,स्वामीनाथन शिफारस लागु करावी यासाठीही सरकारकडे साकडं घालणार आसल्याच पाटील यांनी सांगितले.
Previous Articleकोणार्क एक्सप्रेसवर दरोडा
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.