बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी राज्यसरकारवर बोचरी टीका केली आहे. यावेळी कुमारस्वामी यांनी, वृद्ध, विधवा आणि अपंगांना सहा महिन्यांपर्यंत मासिक पेन्शन देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे सरकारला त्यांच्या कामाचा गाजावाजा करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. असे ते म्हणाले. तसेच हे सरकार अंध आणि कर्णबधिर असून असंवेदनशील आहे. सरकारला नागरिकांविषयी कोणतीही सहानुभूती नाही. प्रथम, राज्य सरकारने समस्येचे निराकरण केले पाहिजे आणि पेन्शन देण्याचे आदेश दिले पाहिजेत.
कुमारस्वामी यांनी राज्यात कोरोना संसर्गामुळे परिस्थिती आणखीनच वाईट होत आहे. अशा वेळी सर्वप्रथम साथीवर नियंत्रण ठेवण्याकडेही सरकारने अधिक लक्ष दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.