बेंगळूर/प्रतिनिधी
राष्ट्र निर्मितीत तरुणांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. तरुणांनी प्रत्येक बदल स्वीकारून काळाबरोबर वाटचाल करूया. त्यांनी स्वत: चे आणि देशाचे भविष्य घडविण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत असे राज्याचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी म्हंटले आहे.
विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यासाठी १५० कोटी रुपयांची योजना राबविण्यात येत असून उच्च शिक्षण संस्थांच्या मूलभूत सुविधा सुधारित करण्यासाठी उच्च शिक्षण विभागासाठी ४३० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. मुलींसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरुणांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात युवा वंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत आम्ही येत्या काही दिवसांत उच्च शिक्षण क्षेत्रात अनेक क्रांतिकारक बदल आणत आहोत. ज्यामुळे कुशल मनुष्यबळ निर्माण होईल तसेच शेकडो नोकऱ्याही तयार होतील. देशाला स्वावलंबी बनविण्यासाठी एक राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार केले गेले आहे. असे शिक्षण असलेले विद्यार्थी इतर बर्याच लोकांना नोकरी देऊ शकतील. स्वामी विवेकानंदांची विचारसरणी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे.
स्वामी विवेकानंद यांनी युवाशक्तीच्या योगदानाने सक्षम देशाच्या निर्मितीची चर्चा केली. स्वामी विवेकानंदांची विचारसरणी ही देशातील तरूणांसाठी मार्गदर्शक आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमात उच्च शिक्षण मंत्री डॉ.सी.एन. अश्वथनारायण, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव कुमार नायक, आयुक्त प्रदीप उपस्थित होते.