उर्वरीत नऊ तालुक्यात अंशत: प्रमाण, ग्रामपंचायत निवडणूक
प्रवीण देसाई / कोल्हापूर
जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून 15 जानेवारीला मतदान होत आहे. यासाठी कागल, शिरोळ व गडहिंग्लज या तीन तालुक्यात पूर्णपणे व उर्वरीत नऊ तालुक्यांमध्ये अंशत: आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींचे प्रमाण 50 टक्केपेक्षा अधिक असणार्या तालुक्यांमध्ये पूर्णपणे आचारसंहिता लागू आहे.
जिल्ह्यात एकूण 1025 ग्रामपंचायती आहेत. त्यातील एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधित मुदत संपणार्या 433 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली आहे. यामध्ये ज्या तालुक्यात 50 टक्केपेक्षा अधिक ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली आहे. त्या पूर्ण तालुक्यासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तर ज्या तालुक्यांमध्ये 50 टक्के पेक्षा कमी ग्रामपंचायतींच्या निवडणूका लागल्या आहेत. तेथे अंशत: आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
यामध्ये शिरोळ तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली असून येथील प्रमाण 63.46 टक्के इतके आहे. कागल तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली असून हे प्रमाण 63.85 टक्के इतके आहे. गडहिंग्लज तालुक्यातील 50 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून हे प्रमार 56.17 टक्के इतके आहे. उर्वरीत नऊ तालुक्यांमध्ये 50 टक्केंपेक्षा कमी ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने येथे अंशत: आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
तालुकानिहाय आचारसंहिता अशी
तालुका ए. ग्रामपंचायती निवडणूक ग्रामपंचायती % आचारसंहिता
शाहुवाडी 106 41 38.67 अंशत:
पन्हाळा 111 42 37.83 अंशत:
हातकणंगले 60 21 35 अंशत:
शिरोळ 52 33 63.46 पूर्ण तालुका
करवीर 118 54 45.76 अंशत:
गगनबावडा 29 08 27.85 अंशत:
राधानगरी 98 19 19.38 अंशत:
कागल 83 53 63.85 पूर्ण तालुका
भुदरगड 97 45 46.39 अंशत:
आजरा 73 26 35.61 अंशत:
गडहिंग्लज 89 50 56.17 पूर्ण तालुका
चंदगड 109 41 37.61 अंशत: