- कुटूंबातल्या सदस्याबद्दल वाढली आत्मीयता
- समाजात वावरताना सवयी बदलल्या
- मुलांच्या हाती दिसू लागले मोबाईल
- निसर्गाचे महत्व समजू लागले
- व्यापार, व्यवसाय, व्यवहार बदलले
प्रतिनिधी / सातारा
गतवर्षी चीनमध्ये कोरोना आला.तो भारतात मार्च महिन्यात येताच सगळं कोरोनाने माणसाचं जगणंच बदलून टाकलं आहे.मग सर्वसामान्य असो की अतिश्रीमंत. प्रत्येकाला आपल्या कुटूंबातल्या व्यक्तीची काळजी, प्रेम वाटू लागले.तर समाजात वावरताना जरी ओळखीचा असेल तरीही दोन हात लांब राहूनच बोलणे चालणे होऊ लागले.सध्या ऑन लॉक 5 सुरू आहे.लोकांच्या वागण्याची पद्धत, राहणीमान, चालीरीती सगळंच कोरोनाने बदलून टाकलं आहे.शिक्षण तर ऑन लाईन होऊ लागले आहे.सगळे व्यवहार ऑन लाईन होताना दिसत आहेत.अगदी ओळखीचा माणूस असेल तरीही त्याच्याशी दुराव्याने वागले जात आहे.
आजही 22 मार्चचा तो दिवस आठवतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळे देश लॉक डाऊन जाहीर केला.अन सगळे जिथल्या तिथेच थांबले होते.मजूर आपल्या गावी परतू लागले.मदतीचा ओघ, पुन्हा थाळी नाद असे वेगळे चित्र डोळ्यासमोर आज उभे राहते.लॉक डाऊनच्या काळात जे एकाच कुटूंबातले पती,पत्नी कधी एकमेकांशी कामाव्यतिरिक्त बोलत नव्हते.मुलं काय करत होती हे समजत नव्हते.पण या सहा महिन्यात कुटूंब एकत्र आले.कुटूंबातील व्यक्तींचे स्वभाव समजू लागले.वैचारिक नाळ एकमेकांना समजू लागले.निसर्गाचे महत्व समजू लागले.कोरोनामुळे बाहेर वावरताना घ्यावयाची काळजी एवढी डोक्यात फिट बसली की आज जरी ऑन लॉक असले तरीही स्वतःची काळजी प्रत्येकजण घेताना दिसत आहे.स्वतःच्या ओळखीचा व्यक्ती जरी दिसला तरी लांबूनच हाय हलो करून लगेच एकला चलो असे चित्र दिसत आहे.
लहान मुलांच्या हाती मोबाईल
ज्या मोबाईलमुळे जग अतिशय जवळ आलं.त्याच मोबाईलला कोरोना येण्यापूर्वी टाळलं जायचं.लहान मुलांच्या तर हातात मोबाईल दिला जात नव्हता.शाळेत मोबाईल नको म्हणून शिक्षा ही झाल्या आहेत.आता मात्र, त्याच्या उलट चित्र आहे.मोबाईलवरच अभ्यास मोबाईलवरच मिटिंग, मोबाईलवरच व्यवहार त्यामुळे मोबाईल अगदी लहान मुलांच्या हाती ही दिसतं आहे.
लाईफस्टाइलच झाली चेंज
घरातून कामाशिवाय कोणीही बाहेर पडत नाही.आणि पडलेच तर स्वत:ला कस इतरांपासून गर्दीत न जाता सांभाळून ठेवता येईल हे पाहिले जात आहे.अगदी पारावर की चौकातल्या गप्पा आता बंदच झाल्या आहेत.त्याऐवजी थेट झूम,गुगल मिटिंग होताना दिसत आहेत.
माणूस म्हणून जगुयात
कोरोनामुळे माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. प्रत्येकाने सवयभान राखले पाहिजे.शिस्त पाळली गेली पाहिजे.देवीच्या काळात कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येकाने सोशल डिस्टनन्स पाळला पाहिजे.वेळ महत्वाची आहे. आणि याच काळात जर कोणी भ्रष्टाचार करत असेल त्याने असे समजू नये की मरण येणार नाही.या संकट काळात भावनेच्या अडून किंवा भीती घालून कोणी गैरफायदा घेत असेल तर नियती सगळ्यांचा हिशोब चुकता करते.इथेच करायचे आणि इथेच फेडायच अस होत असत त्यामुळे या कोरोना काळात माणूस म्हणून जगुयात.