वारणानगर / प्रतिनिधी
कोडोलीत ता. पन्हाळा येथे शासनाने सुरू केलेल्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम सुरू केली असून पाच ट्रॉली कचरा गोळा करण्यात आला आहे.
.शासनाने दहा हजारावर लोकसंख्या असलेल्या गावासाठी माजी वसुंधरा हे अभियान सुरू केले असून ते मार्च पर्यन्त चालणार आहे यामध्ये प्लास्टीक पिशवी वापरल्यास पाच हजार रुपये दंड देखील करण्यात येणार आहे या अभियानात जिल्ह्यातील २३ गावानी सहभाग घेतला आहे.
कोडोली ग्रामपंचायतीच्या कर्मचारीऱ्यांच्या वतीने माझी वसुंधरा या अभियानांतर्गत संपूर्ण कोडोली येथील छत्रपती शिवाजी चौकातुन माझी वसुंधरा या अभियानाची सुरुवात ग्रामविकास अधिकारी ए. वाय. कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीच्या कर्मच्याऱ्यानी कोडोली गावची स्वच्छता करुन पाच ट्रॉली कचरा गोळा केला. जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार प्लास्टीक वापरावर बंदी घातली असुन गावातील व्यापारी व दुकानदारांनी प्लास्टिकच्या पिशवीचा वापर केल्याचे आढळून आल्यास त्यांना पाच हजार रुपयांचा दंड करण्याचा निर्णय कोडोली ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलाआहे. तसेच गावात प्रदुषणाचे प्रमाण किती टक्के आहे याची यंत्रणाद्वारे तपासणी करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत आनंदनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे. दि.३ डिसेंबर रोजी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी गावातून सायकल रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी ए. वाय. कदम यांनी यावेळी दिली. या स्वच्छता अभियानात कोडोली ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी सहभाग घेतला असून प्रशासक तळपे यांचेही सहकार्य मार्गदर्शन लाभत आहे.