बेळगाव/ प्रतिनिधी
Qबेळगाव तालुक्मयात मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपल्याने जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने खरीप हंगामातील भात पेरणीला सुरुवात झाली आहे. तर काही शिवारात पाणी साचल्याने पेरणी लांबणीवर पडणार आहे. पेरणीला पूरक वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी पेरणी कामाकडे वळला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने भात पेरणीसह भुईमूगची पेरणी करताना शेतकरी दिसत आहेत.
वळीव पावसाने बऱयापैकी साथ दिल्याने मशागतीची कामे पूर्ण केली असून यापूर्वी धुळवाफ पेरणी केलेल्या भात पिकाला हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. त्यामुळे धुळवाफ पेरणी उगवणीस सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पेरणीसाठी शेतकऱयांची धडपड सुरू झाली आहे. त्यामुळे बळीराजा बि-बियाणे, खते व अवजारांची जमवाजमव करताना दिसत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात पेरणीला जोर येणार आहे. दमदार पावसामुळे काही शिवारात अद्याप पाणी साचून आहे. त्यामुळे पेरणी लांबणीवर पडण्याची शक्मयता आहे.
विशेषकरून तालुक्मयात खरीप हंगामात भात पिकाबरोबर बटाटे रताळी, भुईमूग, सोयाबीन, मका आदी पिकांची मोठय़ा प्रमाणात पेरणी केली जाते. जूनच्या पहिल्या आठवडय़ात पेरणीस सुरुवात होते. तर काही शेतकरी मृग नक्षत्रावर पेरणी करतात. सध्या शिवारात भात पेरणीसाठी योग्य वातावरण असल्याने शेतकऱयांची लगबग सुरू झाली आहे.
शेतकऱयांना पुन्हा कसरत करावी लागणार
चक्रीवादळामुळे चार दिवस झालेल्या पावसामुळे काही शेतकऱयांनी रताळी लागवडीसाठी बांध मारणे तर काही ठिकाणी रताळी वेल लागवड केली आहे. पावसाने चांगलेच झोडपल्याने शिवारात नुकसान होऊन अनेक ठिकाणी बांध फुटले आहेत. तर काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाने मातीच वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱयांना पुन्हा कसरत करावी लागणार आहे.