नागरीकांनी नियम पाळावेत अन्यथा कठोर कारवाई
प्रतिनिधी/ मेढा
जावळी तालुक्यात गेल्या दोन दिवसांत कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे.दि.11 , 12व 13 एप्रिल रोजी 160 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.या मध्ये विद्यानगर येथील धुंदिबाबा हायस्कूल मधील दहावीच्या 13 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नागरीकांनी नियम पाळून स्वतः ची व इतरांची ही काळजी घ्यावी अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा जावली तालुक्याचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी दिला आहे.
तालुक्यात 13 एप्रिल पर्यंत एकूण 3592 जण कोरोना बाधित झाले आहेत. पैकी 3020 जण बरे होऊन घरी गेले आहेत. 74 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे,तर सध्या 498 जण उपचार घेत आहेत.गेल्या आठ दिवसांत तालुक्यात आठ जणांचा कोरोना मुळे बळी गेला आहे.अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे. दरम्यान नागरिकांनी लक्षणे आढळल्यास त्वरीत टेस्ट करून घ्यावी. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून स्वतःला व कुटुंबाला कोरोना पासून सुरक्षित ठेवावे असे आवाहन श्री . बुध्दे यांनी केले आहे.
बाजारपेठेतील गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी
लॉकडाऊनच्या धास्तीने जीवनावश्यक वस्तू खरेदी साठी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठांत गर्दी होत आहे.वास्तविक लॉकडाऊन मध्ये किराणा, भाजीपाला,यासह अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.त्यामुळे बाजार पेठांत गर्दी करणे हितावह ठरणार नाही.तालुक्यात सध्या रुग्णांची वाढणारी संख्या धोक्याची घंटा आहे.प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.जनतेने नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी टोम्पे यांनी केले आहे.
नियम मोडणाया लोकांवर कारवाई होणारच
दि. 14 च्या रात्री पासून लॉकडाऊन ची कडक अंमलबजावणी सुरू होत असून विनामास्क तसेच विनाकारण रस्त्यावर येणाया तसेच सोशल डिस्टेंसिंग नसणारांवर आणि नियम मोडणायांवर कारवाई होणारच असा इशारा सपोनि अमोल माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
आपल्या जावली तालुक्यातील सावली या गावामध्ये कोरोनाच्या दुस्रया लाटेचा संसर्ग मोठा प्रमाणात झाला आहे आणि आत्तापर्यंत दोन तरुण सावली गावाने गमावली आहेत बाधित लोकांचा आकडा हा 70 च्या पार आहे आणि अजुनही 270 लोकांची चाचणी बाकी आहे. .गेल्या पाच सहा दिवसांपासून गाव सिल केले आहे आणि आज हा संसर्ग वाढू नये म्हणून गावाने टाळेबंदी घोषित केली आहे. व बाधित लोकांचे विलगिकरण करुन त्यांना शाळेमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे शासनाचे सर्वोतपरी प्रयत्न चालू आहेत.मात्र शासनाची मदत कमी पडत आहे जे निगेटिव्ह आहेत ते पा?झिटीव्ह होवू नयेत व जे पा?झिटीव्ह आहेत त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी औषधोपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे म्हणून समाजातील दाते मंडळीने मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे.
ज्या गांवात रुग्ण संख्या जास्त आहे त्या गांवातील व्यक्तींना गांवाबाहेर पडण्यास व बाहेरच्या गांवातील व्यक्तींना त्या गांवात प्रवेश नाकारण्यात यावा. व कडक निर्बंध प्रशासनाने लावावेत अशी मागणी सर्वसामान्यांच्या मधून होत आहे.