कमाल तापमान 28 अंशांवर
प्रतिनिधी/ बेळगाव
यावषी हिवाळय़ातच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे थंडी गायब झाली होती. मात्र गेल्या 10 दिवसांपासून थंडीत वाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेला हुडहुडीचा सामना करावा लागत आहे. मध्यंतरी कडाक्मयाची थंडी पडली होती. मात्र आता थंडी थोडीशी कमी झाली असली तरी रात्री आणि पहाटेच्यावेळी जोरदार थंडी पडू लागली आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकर्ससह साऱयांनीच उबदार कपडे परिधान करण्याकडे भर दिला आहे.
काही दिवसांपासून बेळगावातील नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. मात्र यावषी उशिरानेच थंडीला सुरुवात झाली आहे. या थंडीमुळे सर्वांनाच गरम कपडय़ांचा आधार घ्यावा लागत आहे. कमाल तापमानात घट झाली आहे. कमाल तापमान 28.6 तर किमान तापमान 12 अंश अशी नोंद शनिवारी झाली आहे. किमान तापमानात घट झाली नसली तरी कमाल तापमानात मात्र गेल्या आठ दिवसांत अधिक घट झाल्याचे दिसून आले.
गेल्या काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली होती. सुरुवातीच्या काळात किमान तापमान 10 अंशांवर पोहोचले होते तर कमाल तापमान 22 अंशांवर आले होते. आता त्यामध्ये थोडीशी वाढ झाली आहे. ग्रामीण भागामध्ये भातमळण्यांची आटोपती घेण्याकडे कल आहे. सकाळच्यावेळी ग्रामीण भागामध्ये या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधारही घेताना दिसत आहेत. वाढलेल्या थंडीमुळे सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांचा सामनाही करावा लागत आहे.
यातच ओमिक्रॉनसारखा आजार आल्यामुळे काहीसे भीतीचे वातावरण पसरले आहे. या थंडीमुळे सर्दी, खोकला, फ्ल्यूदेखील होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली असून दवाखान्यांमध्ये गर्दी असल्याचे चित्र दिसून येत आहे. रात्रीच्यावेळी दुचाकीवरून जाताना प्रत्येकाला थंडीपासून बचाव करण्यासाठी हातमोजे, कानटोपी, स्वेटर, जॅकेट, बूट यांचा आधार घ्यावा लागत आहे.
आता संक्रांती जवळ आली असून थंडी ओसरण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. दरवषी ऑक्टोबरच्या अखेरनंतर थंडीला सुरुवात होते. मात्र यावषी डिसेंबरपर्यंत अधूनमधून पाऊस पडत होता. त्यामुळे थंडी गायब झाली होती. हिवाळय़ात पाऊस पडत असल्यामुळे वातावरणामध्ये मोठा बदल यावषी जाणवला आहे.