ऑनलाईन टीम / मुंबई
महाराष्ट्रात कोरोनाचे 1202 रुग्ण एका दिवसात बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आता पर्यंत बरे झालेल्या रुग्ण संख्येचा हा उच्चांक आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
ते म्हणाले, राज्यात दिवसाला सुमारे 15 हजार चाचण्या होत आहेत. त्यासाठी 65 प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यात रुग्ण हा केंद्रबिंदू मानून धोरण राबवले जात आहे. रुग्णांची खाजगी रुग्णालयाकडून होणारी लूट थांबविण्यासाठी दर नियंत्रण कायदा केला असून प्रजा सक्षम अंमलबजावणीसाठी प्राधिकारी ही नेमण्यात आले आहेत.
सध्याच्या स्थितीला राज्याचा कोरोना मृत्युदर हा 3.2 टक्के असून रुग्ण बरे होण्याचा दर 25 टक्के आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
- आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी भरती
आरोग्य विभागातील डॉक्टर, विशेषज्ञ, नर्स, कर्मचारी यांची 17 हजार रिक्त पदे येत्या दोन महिन्यात भरण्यात येतील. त्यासाठी सविस्तर बैठक घेण्यात आली आहे. लॉक डाऊनच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक असणाऱ्या मुलाखती घेऊन ती पटे भरली जातीला शिवशाही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.