प्रतिनिधी/ म्हापसा
स्वतःची तिकीट कुणीही स्वतः जाहीर करू शकत नाही. निवडणुका घोषित झाल्या की पक्ष उमेदवारांच्या तिकीट जाहीर करतो. केवळ नावाची शिफारस केली जाते. जिंकण्याची क्षमता पाहिली जातेच त्याचप्रमाणे आज सर्व भाजपा आमदार चांगले कार्य करीत आहेत. इच्छा प्रकट करणे वेगळे आणि त्याला तिकीट द्यावी की नाही हे वेगळे आहे. जिंकण्याची क्षमता, लोकप्रतिसाद आदी सर्वकाही पार्लमेंटरी समिती ठरविते. स्थानिक याबाबत काहीच ठरवित नाही त्यामुळे नाहक स्वयंघोषित उमेदवारी ठरविणे योग्य नाही. प्रत्येक मतदारसंघात भाजपाचा उमेदवार एकच असणार अशी माहिती भाजपा गोवा प्रभारी तथा राष्ट्रीय सचिव सी.टी. रवी यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी व्यासपीठावर भाजपा गोवा प्रभारी सी.टी. रवी, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, उत्तर गोवा भाजपा अध्यक्ष महानंद अस्नोडकर, माजी आमदार दामू नाईक, आयटी प्रमुख रुपेश कामत उपस्थित होते.
आज आम्ही सेवाई संघटनाच्या नावे काम करीत आहे. निवडणुकीच्या बाबतीत प्रत्येक मतदारसंघाची कामगिरी वेगवेगळी आहे. कोण जिंकू शकतो, चांगले कामे कुणी केली याकडे पक्ष पाहतो. 10 वेगळे पणाचे आमदार भाजपात आले त्यांनाही हा नियम लागू आहे काय असा प्रश्न सी.टी. रवी यांनी केला असता ते म्हणाले, अनेकजण चांगले काम करतात. आमदार मंत्री सगळे चांगले काम करतात. कोविड समयी वा अन्यवेळी कुणी चांगले कार्य केले वा केले नाही यांची माहिती मिळाली आहे. जे दहाजण आतमध्ये आले ते सर्वजण आता भाजपाचेच आहे असे गोवा प्रभारी सी.टी. रवी यांनी सांगितले. आज जे कुणी आमदार आहेत ते आपल्यास पुन्हा तिकीट मिळेल ही अपेक्षा धरून आहेतच पण कुणाला उमेदवारी द्यावी याचा एकमात्र निर्णय पार्लमेंटरी समितीच घेऊ शकते. तो अधिकार अन्य कुणाला नाही अशी माहिती गोवा प्रभारी श्री. रवी यांनी दिली. ते अपेक्षा ठवू शकतात. उमेदवारीबाबत पक्षाचे धोरण वेगळे आहे. ते फक्त निवडणुकीपूर्वीच घोषित करतात. निवडणुका जाहीर झाल्यावरच उमेदवार निश्चित होतो असे ते म्हणाले.
भाजप कुणाच्या हातात कमळ देणार त्यानाच जनता निवडून आणणार- तानावडे
काही कार्यकर्ते आमदारापेक्षा चांगले कार्य करतात. त्यांना उमेदवारी देण्यात येईल काय? असा प्रश्न प्रदेशाध्यक्ष तानावडे यांना केला असता ते म्हणाले, 2017 मध्ये कार्यकत्याला उमेवदारी दिली म्हणून ते सिनियर होऊ शकत नाही. भाजपमध्ये लोक आले ते वेगवेगळय़ा पक्षातून आले आहे. भाजपला सत्तेवर यायला पाहिजे म्हणून पार्लमेंट समिती योग्य तो निर्णय घेणारच. आम्हाला कुणालाच त्याचा अधिकार नाही अशी माहिती श्री. तानावडे यांनी दिली. भाजप पक्ष एवढा मोठा पक्ष झाला, तो फक्त लिडरांचा उमेदवार झाला नाही कार्यकर्त्यांच्या आधारावर हा पक्ष मोठा होत गेला आहे. आम्ही भाजप आमदार, राज्य प्रदेशाध्यक्ष झालो मात्र आपल्याबरोबरचे लोक ज्येष्ठ कार्यकर्ते आज नगरसेवक वा पंचही झाले नाही. त्यामुळे पक्ष चालतो तो त्यांच्या आधारावरच. म्हणून हे कार्यकर्ते कुणाच्याही पाठिशी राहणार नाही. तर भाजप ज्यांच्या हातात कमळ देणार त्यांनाच निवडून आणणार आहेत.
कोविड काळात सरकारचे नागरिकांना योग्य सहकार्य
कोविड काळात भाजपने घरोघरी सेवा दिली. ऑक्सिमीटर, ऑक्सिजन दिले गेले. अनेक लोकांना रुग्णवाहिका घरोघरी पोचविल्या. 24X7 हेल्पलाईन सुरू केली. अंतिमसंस्कारही करण्याचे कार्य केले. तिसरा टप्प्यासाठी सरकारने पावले उचलली अहे. भाजपचा मॅडिकल विभाग आहे त्या अंतर्गत डॉ. शेखर साळकर पर्यवेक्षक आहे. डॉक्टरची टिम आहे. त्यात अ. गो. अंतर्गत गोवा प्रभारी सी.टी रवी हे प्रमुख आहेत. आम्ही पक्ष म्हणून तिसऱया लाटेला सामोरे जाण्यास तयार आहोत. अनेकांना ट्रेनिंगही देण्यात येणार आहे. कोविडने डॉक्टर्स मृत्यू पोचले होते त्यांना 50 लाख घोषित केले होते ते कुठे पोचले असा प्रश्न प्रदेशाध्यक्षांना केला असता ते म्हणाले की, मुख्यमंत्रीच योग्य प्रकारे सांगू शकेल असे ते म्हणाले.