शेवटचा निकाल मध्यरात्री जाहीर, कार्यप्रणाली पूर्ण करण्यासाठी तब्बल 21 तास करावी लागली कसरत
प्रतिनिधी/ बेळगाव
ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी बुधवार दि. 30 रोजी सकाळी 8 वाजता सुरू झाली. बेळगाव तालुक्मयातील 55 ग्रामपंचायतींचा निकाल लागण्यासाठी तब्बल 16 तास 45 मिनीटे लागली तर सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी पहाटे 5 वाजले. यामुळे 21 तास या निकालासाठी अधिकाऱयांना कसरत करावी लागली. दुसऱया दिवशी साऱयांच्याच डोळय़ांवर झापड होती. त्यामुळे कार्यालयात उपस्थित असले तरी कामावर लक्ष केंद्रित करणे त्यांना अवघड बनले होते.
निवडणूक अधिकारी मात्र ग्रामपंचायतींचा संपूर्ण अहवाल तयार करण्यासाठी दुसऱया दिवशीही कर्मचाऱयांना जुंपण्यात आले होते. त्यामुळे इतर कामांकडे साऱयांचेच दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. कोणीही कामासाठी गेले तरी आता चार दिवस सोडूनच तुम्ही या, अशी उत्तरे देण्यात येत होती. त्रासलेल्या स्थितीतच सर्व जण काम करत असल्याचे दिसून आले. ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी नियोजनबद्धरित्या झाली नाही. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसला आहे.
ग्रामपंचायत निवडणूक ही नेहमीचीच चुरशीची असते. या निवडणुकीचा मतदानाचा टक्काही नेहमीच वाढलेला असतो. बेळगाव तालुक्मयामध्ये जवळपास 84 टक्के मतदान झाले होते. याचबरोबर उमेदवारांची संख्याही अधिक होती. बेळगाव तालुक्मयामध्ये एकूण ग्रामपंचायत सदस्य संख्या 1037 होती. यासाठी 3 हजार 5 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे मतमोजणी करणे अवघड झाल्याचे दिसून आले.
एका ग्रामपंचायतीच्या वॉर्ड कार्यक्षेत्रात 10 ते 12 जण रिंगणामध्ये उतरले होते. त्यामुळे मतमोजणी करण्यास उशीर होत होता. काही ठिकाणी तिघांना मते द्यायची होती तर काही ठिकाणी चार जणांना मते द्यायची होती. त्यामुळे ती मतपत्रिका तपासताना अधिकाऱयांबरोबरच साऱयांनाच त्याचा लेखाजोखा ठेवताना कसरत करावी लागली. काही जणांनी पुनर्मतमोजणी करण्याची मागणी केली होती. मात्र वेळेअभावी ती स्वीकारली गेली नसल्याच्या तक्रारीही झाल्या आहेत. एकूणच या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सावळा गोंधळ झाल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर कर्मचाऱयांची संख्या कमी असल्यामुळे मोठा फटका बसला आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.