सावंतवाडी/ प्रतिनिधी-
१९६४ साली स्थापन करण्यात आलेल्या नेमळे सहकारी कौल उत्पादक संस्थेला आधुनिकतेची जोड देत उर्जितावस्था आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. १०० कुटुंबांचा चरितार्थ चालणाऱ्या कारखान्याची पुनर्बांधणी करण्यासाठी १ कोटी भांडवलाची आवश्यकता असल्याचे कौल कारखान्याचे अध्यक्ष आत्माराम राऊळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.संचालक मंडळाच्या सभेनंतर बुधवारी ७ जूनला जि.बॅक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सदर कारखान्याची पाहणी केली. शासनाकडून याबाबत मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे सावंत यांनी कारखाना पाहणी दरम्यान सांगितले.
गेल्या ५७ वर्षात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार तत्वावर चालणाऱ्या एकमेव कारखान्याला उर्जितावस्था आणून सुमारे १०० कुटुंबांचा चरितार्थ चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी १ कोटीच्या भांडवलाची गरज आहे. अद्ययावत मशनरी, सोलारद्वारा कारखान्याला वीज, फॅन्सी कौल, सिमेंट कौल निर्मिती अशा विविध योजना राबविण्याचा संस्थेचा मानस असून आर्थिकदृष्ट्या हातभार लावण्याची गरज भासत असल्याचे राऊळ यांनी सांगितले. वर्षभरात 10 लाख कौल आणि 5 लाख बांधकाम विटांची निर्मिती सदर कारखाना करत असून
100 कामगार कार्यरत आहेत.