प्रतिनिधी / बेंगळूर
सरकारने अद्याप आपल्या मागण्यांची पुर्तता केलेली नाही, असा ठपका ठेवून राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱयांनी गुरुवारपासून दंडाला काळय़ा फिती बांधून सरकारविरोधात चळवळ सुरू कली आहे. राज्य परिवहन कर्मचाऱयांनी प्रमुख 9 मागण्यांसाठी आंदोलन हाती घेतले आहे. मागण्यांसाठी कर्मचाऱयांनी 7 एप्रिलपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
परिवहन कर्मचाऱयांनी 6 एप्रिलपर्यंत वेगवेगळय़ा पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी आंदोलनाच्या दुसऱया दिवशी केएसआरटीसी, बीएमटीसी, वायव्य व ईशान्य परिवहन विभागाच्या कर्मचाऱयांनी आगारांमध्ये आपल्या कुटुंबीयांसमवेत भजी-वडे तयार करून त्यांची विक्री करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
बेंगळूरमधील विविध सर्कलमध्ये कुटुंबीयांसमवेत एकत्र येऊन परिवहन कर्मचाऱयांनी आंदोलन छेडले. शनिवारी 3 एप्रिल रोजी हे कर्मचारी शहरांमधील चौकांमध्ये मानवी साखळी निर्माण करून फलक दाखवून निदर्शने करणार आहेत.