बेंगळूर/प्रतिनिधी
पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतींमध्ये सतत वाढण्याबरोबरच वीजदरात वाढ केल्याने नागरिक त्रस्त आहेत. या उत्पादनांच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने आवश्यक ती कार्यवाही केली पाहिजे, अशी मागणी जनता दल-एसचे प्रदेशाध्यक्ष कुमारस्वामी यांनी केली आहे.
मारस्वामी यांनी पेट्रोलियम पदार्थांसह इतर अनेक उत्पादनांच्या किंमती वाढल्यामुळे सामान्य लोक चिंतित आहेत. सरकारचा बहुतेक कार्यकाळ केवळ मंत्रिमंडळ स्थापनेच्या चर्चेत गेला आहे. राजकीय अस्थिरतेच्या वातावरणामुळे राज्याच्या कारभारावर परिणाम होत आहे, नैसर्गिक आपत्तीची घटना असो वा कोरोना साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी, राज्य सरकार प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरले आहे.
सरकारने वारंवार निर्णय बदलल्यामुळे प्राथमिक ते उच्च शिक्षण क्षेत्रात अनागोंदीचे वातावरण आहे. शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्यास अवघे चार महिने शिल्लक आहेत, त्यामुळे आता वर्ग सुरू केले जात आहेत. परीक्षा कधी घेण्यातयेणार, निकाल कधी मिळतील याविषयी स्पष्ट उत्तर नाही.