बुधवारी अहवालात 470 जण बाधित763 जणांची कोरोनावर मात
प्रतिनिधी /सातारा
ऑगस्टच्या मध्यापासून बाधित वाढीचा वेग मंदावू लागला. ऑगस्ट अखेरीस वाढ 500 खाली घसरली असून सप्टेंबरच्या आरंभी वाढीचा आलेख 500 च्या खाली स्थिर राहिल्याने गुरुवारी 470 जणांचा अहवाल बाधित आला तर गेल्या दोन तीन दिवसात मृत्यूदराचा आलेख दिलासादायकरित्या खाली घसरला असून 1, 2 अशी संख्या समोर येत आहे. आठ तालुक्यांमध्ये बाधित वाढ दोन अंकी संख्येने समोर येत असून तीन तालुक्यात ती अंकावर आल्याने पाटण, जावली, महाबळेश्वरांमध्ये स्थिती आटोक्यात आलीय.
दरम्यान, जिह्यात गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 470 नागरिकांचे अहवाल बाधित आले असून 1 बाधितांचा मृत्यु झाला. गुरुवारी सायंकाळी 763 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा, फलटण, माणमध्ये वाढ
वेग मंदावला असला तरी सातारा, फलटण व माणमधील वाढ चिंताजनक आहे. तर कराडसह कोरेगाव, खंडाळा, वाई, खटावमध्ये घसरु लागलेला बाधित वाढीचा आलेख चांगला आहे. तर पाटण, जावली व महाबळेश्वर या तीन तालुक्यात एक अंकी संख्येने बाधित वाढ समोर येत असून जिल्हय़ात टेस्टिंगचे आकडे मोठे असले तरी पॉझिटिव्ही दराचा आलेख घसरत असल्याने कोरोनाचा ससेमिरा कमी होईल अशी आशा पल्लवित झालेली आहे.
गुरुवारी 4 हजार 838 जणांचे लसीकरण
गुरुवारी लसीकरणाचा वेग खूपच मंदावलेला होता. दिवसभरात एकूण 4 हजार 838 नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती कोविन डॅशबोर्डवर उपलब्ध आहे. यामुळे एकूण लस घेणाऱया नागरिकांची संख्या 18 लाख 68 हजार 238 एवढी झाली आहे. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 13 लाख 20 हजार 858 एवढी असून दुसरा घेतलेल्या नागरिकांची संख्या 5 लाख 47 हजार 380 एवढी झाली असून दुसरा डोसही कमी गतीने नागरिकांना मिळत आहे.
470 बाधित, एक बाधिताचा मृत्यू
बुधवारी रात्री अहवालानुसार तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे. फलटण 97 (34,943), सातारा 84 (49,394), माण 77 (16,920), कराड 53 (37,958), कोरेगांव 53 (21,063), खटाव 45 (24,311), खंडाळा 17 (13,830), वाई 23 (15,377), पाटण 6 (9,962), जावली 3 (9,823), महाबळेश्वर 2 (4,588), व इतर 10 (1,908) असे आज अखेर एकूण 240547 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या खटाव 1 अशी असून आजअखेर जिह्यामध्ये एकूण 6,051 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुक्ती 2 लाख 28 हजारांनजिक
जिल्हय़ात एकूण बाधितांची संख्या 2 लाख 40 हजार 547 एवढी झाली असली तरी त्यापैकी 2 लाख 27 हजार 945 जणांनी कोरोनावर मात करत लढाईला बळ दिले असून यामुळे एकूण कोरोनामुक्तांची संख्या 2 लाख 28 हजारांच्या उंबरठय़ावर उभी आहे. गुरुवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार 763 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
आरोग्य कर्मचारी कमी करुन लढणार कसे?
एकीकडे दुसरी लाट मंदावत असल्याचा अल्प दिलासा मिळत असला तरी अद्याप तीन अंकी संख्येने सुरु असलेली थांबलेली नाही. फक्त ती 500 च्या खाली घसरु लागली असताना प्रशासनाची तिसऱया लाटेची तयारी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या विविध विभागात काम करणाऱया कोरोना योध्दा कर्मचाऱयांना कमी करण्यात येत आहे. या कर्मचाऱयांनी पहिल्या व दुसऱया लाटेत चांगले काम केल्याने आरोग्य विभागाला दिलासा लाभला होता. आता तिसऱया लाटेचे भाकित सांगणारे प्रशासन कर्मचारी कमी करुन लढणार कसे ? असा सवाल निर्माण होतो.
गुरुवारपर्यंत जिल्हय़ात
- एकूण तपासणी 18,18,164
- एकूण बाधित 2,40,547
- एकूण कोरोनामुक्त 2,27,945
- एकूण मृत्यू 6,051
- एकूण उपचारार्थ 9,956
गुरुवारी जिल्हय़ात
- बाधित 470
- मुक्त 733
- मृत्यू 01