ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारमध्ये मागील चोवीस तासात सहा जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने 15 लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती बिहार आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मृतांमध्ये गोपालगंज मधील 3, भोजपुर 3, रोहतास 3, सारण 2, कैमूर 2 आणि वैशालीमधील 2 जणांचा समावेश आहे.
दरम्यान, बिहारमध्ये पावसाळ्यात वीज पडून होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. वातावरणातील बदलामुळे वीजा कोसळण्याच्या घटना घडत आहेत.
या घटनेनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत देण्याची घोषणा देखील केली आहे.