बेळगावातील 88 जणांचा समावेश : 9 जणांचा मृत्यू : 25 हजार जणांनी पूर्ण केले 28 दिवसांचे क्वारंटाईन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्ह्य़ातील 25 हजारहून अधिक जणांनी 28 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केले आहे. एकूण बाधितांच्या आकडय़ाने 2500 चा टप्पा पार केला असून सोमवारी आणखी 266 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये मात्र 6 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
उपलब्ध माहितीनुसार बेळगाव शहर व तालुक्मयातील 88 जणांचा यामध्ये समावेश आहे. केवळ शहर व उपनगरात 78 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर तालुक्मयातील 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. लक्षणे नसणाऱयांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत असून उर्वरित रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
सदाशिवनगर, आंबेडकनगर, कुमारस्वामी लेआऊट, शिवबसवनगर, वडगाव, टिळकवाडी, उचगाव, कचेरी गल्ली-शहापूर, वैभवनगर, अंजनेयनगर, होसूर, अन्नपूर्णावाडी, कॅम्प, विरभद्रनगर, संगमेश्वरनगर, सिध्दार्थनगर, कोतवाल गल्ली, सुभाषनगर, सुळगा-हिंडलगा, जालगार गल्ली, शाहूनगर, श्रीनगर, ओमनगर, मारिहाळ, गणेशपूर, भाग्यनगर येथील बाधितांचा यामध्ये समावेश आहे.
जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाला आणखी 1801 स्वॅब तपासणी अहवालांची प्रतिक्षा आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या 38 जणांना सोमवारी घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत 705 जण बरे झाले आहेत. तर 2500 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.