प्रतिनिधी/ बेळगाव
श्रावण महिना सुरू असल्यामुळे भाजीच्या दरात वाढ होण्याची शक्मयता होती. मात्र, भाजीचे दर सध्या तरी स्थिर आहेत. काही प्रकारच्या भाजीपाल्याच्या दरात किंचीत घसरण झाली आहे. बटाटा मात्र स्थिर असून इंदूर आणि आग्रा येथीलच बटाटा बाजारपेठेत उपलब्ध आहेत. स्थानिक बटाटा गणपतीनंतरच येण्याची शक्मयता व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे येणाऱया भाजीपाल्याची आवक काहीशी कमी झाली आहे. पावसामुळेही भाजीपाला काही ठिकाणचा येत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. असे असले तरी भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. टोमॅटो किरकोळ विक्री 25 ते 30 रुपये किलो आहे. भेंडी 25 ते 30 रुपये किलो आहे. फ्लॉवर 20 ते 25 रुपये आहे. कोबीही 20 ते 25 रुपयांपर्यंत आहे. मागील आठवडय़ापेक्षा भाजीपाल्याच्या दरात काहीशी घसरण झाली आहे.
श्रावण असल्यामुळे भाजीपाला खरेदीकडेच साऱयांचे लक्ष लागलेले असते. कोरोनामुळे ग्रामीण भागातील जनतेने पाठ फिरविली आहे. याचबरोबर ग्रामीण भागातही आता भाजीपाला बऱयापैकी उपलब्ध होत आहे. त्यामुळे बेळगाव बाजारपेठेकडे ग्रामीण भागातील जनता फिरकत नसल्याचे दिसून येत आहे. शनिवारी बाजाराचा मुख्य दिवस असला तरी बाजारपेठेत मात्र तुरळक प्रमाणात गर्दी दिसून आली.
शहरापासून 10 ते 15 किलोमीटरवर असलेल्या गावांतील शेतकरी रस्त्यावरच भाजीपाला विकू लागले आहेत. त्यामुळे थेट शेतकऱयांकडून तसेच ताजी भाजी मिळत असल्यामुळे परगावी जाणारे नागरिकदेखील तेथेच भाजी खरेदी करताना दिसू लागले आहेत. गोकाक, बैलहोंगल, रायबाग, कित्तूर या परिसरातील भाजी बेळगावकडे कमी प्रमाणात येत आहे. मात्र, बेळगावजवळ असलेल्या अनेक गावांतून शेतकरी भाजीपाला एपीएमसीकडे आणत आहेत. त्यामुळे सध्या तरी भाजी पुरवठा बऱयापैकी उपलब्ध होत आहे. त्यामुळे भाजीचे दर स्थिर आहेत.
दर शनिवारी गर्दी होत असते. मात्र, कोरोनामुळे तसेच बकरी-ईदमुळे नागरिकांची गर्दी कमी दिसत होती. मुख्य बाजारपेठेत दुपारच्या वेळी काही प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून येत होते. असे असले तरी कोरोनाच्या भीतीपोटी शहराकडे जनता फिरकत नसल्याचे दिसून येत आहे.