वार्ताहर/कणकुंबी
कणकुंबी भागातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी कणकुंबी हायस्कूलमध्ये येणाऱया चिगुळे गावच्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना चिगुळे गावानजीक शनिवारी दुपारी एकच्या दरम्यान घडली.
कणकुंबीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या चिगुळे गावच्या डोंगर माथ्यावरील श्री माउली देवीचे मंदिर आणि नयनरम्य परिसर पाहण्यासाठी तसेच परिसरातील लहान-मोठय़ा धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी बेळगाव परिसरामधून अनेक पर्यटक येत असतात. विशेषतः यामध्ये तरुणाईची संख्या जास्त असते. यातील काही युवावर्ग मद्यप्राशन करून कणकुंबी भागातील चिगुळे, पारवाड, चिखले आदी गावांच्या रस्त्यांवर धिंगाणा घालत असतात.
शनिवार दि. 20 रोजी दुपारी एकच्या दरम्यान चिगुळे रस्त्यावर चार-पाच युवक मद्यप्राशन करून रस्त्यावर बाटल्या फोडणे, धिंगाणा घालणे, ओरडणे असे प्रकार करत होते. यावेळी चिगुळे गावचे कणकुंबी हायस्कूलला गेलेले विद्यार्थी आपल्या गावी दुपारी घरी परतत होते. त्यावेळी मद्यप्राशन करून दंगामस्ती करणाऱया युवकांनी आपला मोर्चा विद्यार्थ्यांकडे वळविला. त्यातील काही विद्यार्थी घाबरून पळून गेले तर काही विद्यार्थी मद्यधुंद अवस्थेतील युवकांच्या हाती सापडले. त्यामध्ये विनायक संतोष चौगुले व किरण कृष्णा गावडे या दोन विद्यार्थ्यांना त्या मद्यधुंद अवस्थेतील युवकांनी मारबडव केली आहे.
या भागात येणारे अनेक युवक दारू पिऊन दंगामस्ती करणे, धांगडधिंगाणा घालणे, अंगावरचे कपडे काढून नाचणे व महिलांची छेडछाड करणे असे वारंवार प्रकार करत असतात. याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून अशा युवकांवर आळा घातल्यास अनुचित प्रकार घडणार नाहीत. या भागातील धबधबे पाहण्यासाठी येणाऱया पर्यटकांना वनखात्याने बंदी घातली होती. परंतु पुन्हा युवकवर्गाचा वावर सुरू झाल्याने कणकुंबी भागात अशांतता पसरलेली आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना मारबडव करण्याची आजपर्यंत कधीही घटना घडली नव्हती. परंतु शनिवारच्या घटनेत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीमुळे कणकुंबी भागामध्ये संताप पसरला आहे.
हुल्लडबाजी करणाऱया पर्यटकांचा बंदोबस्त करा
यापुढे या भागामध्ये येणाऱया सर्व पर्यटकांना याचा फटका बसण्याची शक्मयता असून अशा वाईट पर्यटकांबरोबरच चांगल्या पर्यटकांनासुद्धा त्रास होण्याची शक्मयता आहे. तेव्हा पोलीस प्रशासन आणि वनखात्याने अशा हुल्लडबाजी करणाऱया पर्यटकांचा बंदोबस्त करावा किंवा प्रवेशबंदी करावी, अशी मागणी होत आहे.