प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र सरकारने अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर भाजप महाराष्ट्र सरकारविरोधात आंदोलने करताना दिसत आहे. बेळगावमध्येही अभाविप आणि भाजपने आंदोलन करून जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले आहे.
अभाविप संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. याचबरोबर भाजप युवा मोर्चातर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्र सरकार चौथा स्तंभ म्हणून ओळखलेल्या माध्यमांचा गळा घोटण्याचे काम करत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी अभाविप व भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.