कसबा बीड / प्रतिनिधी
गेली दहा ते पंधरा दिवस महे कसबा बीड पुलावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद होती. आज सायंकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी पुलावरील पाणी ओसरल्याने वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे.
कसबा बीड पासून जवळपास 25 गावांचा वाहतुकीसाठी असणारा मुख्य रस्ता पुलाखाली गेला होता. त्यामुळे या परिसरातील वाहतूक व्यवस्था वीज पुरवठा व पाणीपुरवठा या सर्वांची घडी विस्कळीत झाली होती. पुलावर पाणी असताना इलेक्ट्रिकचे में थांब पाण्याखाली गेल्याने येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम केले. वीज पुरवठा व पाणीपुरवठा सुरळीत केला. आज पाणी पुलावरून उतरल्याने कसबा बीड भागातील दैनंदिन जीवन सुरू होण्यास सुरुवात झाली आहे.