ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मुंबईतील वांद्रेनंतर आता दिल्लीतही सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजवत हजारो परप्रांतीय मजूर यमुना नदीकाठी एकत्र आले आहेत. देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आल्याने हाती काम नसलेल्या परराज्यातील मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गावी जाण्यासाठी हे मजूर मोठ्या संख्येने ठिकठिकाणी एकत्र जमले आहेत.
हजारोंच्या संख्येने गावी जाण्यासाठी एकत्र आलेल्या या मजुरांना फळे देऊन वेगवेगळ्या शेल्टर होममध्ये नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही मजुरांवर उपासमारीची वेळ येणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. मात्र, तरी देखील हाती काम नसल्याने हे मजूर रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचीही डोकेदुखी वाढली आहे.