प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात मुख्यमंत्रिपदाची खुर्ची रिकामी नाही. येडियुराप्पा हेच आपल्या सर्वांचे नेते आहे. राज्यातील जनतेनेच येडियुराप्पांना मुख्यमंत्रिपदावर बसविले आहे. त्यामुळे नेतृत्व बदलाचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी दिली आहे. हावेरी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भाजपमध्ये कार्यकर्त्यांपासून ज्येष्ठ नेत्यांपर्यंत कोणीही सत्तेचा चिकटून बसलेले नाहीत, असे ते म्हणाले.