वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील वाहणाऱया म्हादई नदीच्या पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे सत्तरी तालुक्मयातील एकूण 12
गावांचा संपर्क वाळपई शहरापासून तुटलेला आहे .अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी भरल्यामुळे गंभीर स्वरुपाची समस्या निर्माण झाली असून ग्रामीण भागाकडे जाणाऱया नागरिकांनी वाळपईच्या पोलीस स्थानकावर हजेरी लावून उपयोजना काढण्याची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी जाणारी वाहने वाळपई शहरांमध्ये अडकून पडले होती.यामुळे ग्रामीण भागात जाणाऱया नागरिकांचे बऱयाच प्रमाणात हाल झाले होते.
याबाबतची माहिती अशी की आज सकाळपासून मोठय़ा प्रमाणात पडणाऱया पावसाचा प्रतिकूल परिणाम सत्तरी तालुक्मयाच्या ग्रामीण भागात पाहावयास मिळाला. एकूण प्राप्त माहितीनुसार म्हादई नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात वाढली असून यामुळे सत्तरी तालुक्मयातील सोनाळ सावर्डे ,धारखण ,कुडसे, सावर्शे, खडकी, गुळेली, शेळ मेळावली, पैकुळ धडा मुरमुणे खोतोडा, आदी गावाचा संपर्क वाळपई शहरातून तुटलेला आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार वाळपई -फोंडा मार्गावर गुळेली या ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाण्याचा साठा झालेला आहे. त्याचप्रमाणे वाळपई शहरातून सोनाळ गावात जाणाऱया रस्त्यावर पाणी भरल्यामुळे सदर गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे .वेळुस याठिकाणी पाणी भरल्यामुळे नगरगाव आदी भागांमध्ये जाण्यासाठी अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. रात्री उशिरापर्यंत अशाच प्रकारची परिस्थिती होती .
दरम्यान वाळपई शहरातून गावाकडे जाणाऱया ग्रामीण भागातील नागरिकांची यामुळे बऱयाच प्रमाणात धांदल उडाली असून वाळपई शहरांमध्ये वाहनांची गर्दी झालेली आहे. त्याचप्रमाणे बऱयाच नागरिकांनी वाळपई पोलीस स्थानकावर धाव घेऊन ग्रामीण भागात जाण्यासाठी व्यवस्था करा अशा प्रकारची मागणी केली .पोलीस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर यांनी याबाबत काही जंणाची ग्रामीण भागात जाण्यासाठी व्यवस्था केली. मात्र अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाची परिस्थिती असल्यामुळे ते व्यवस्था करणे शक्मय झाले नसल्याचे त्यांनी यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.