ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राष्ट्रीय आयुष मिशन सन 2026 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या निर्णयाची माहिती दिली.
ठाकूर म्हणाले, 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत राष्ट्रीय आयुष मिशन सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या मिशनअंतर्गत एकूण 4607 कोटी रुपये खर्च केले जातील. देशभरात 12,000 हेल्थ आणि वेलनेस सेंटर सुरू करण्यात येतील. 6 आयुष महाविद्यालये आणि 12 आयुष पदव्युत्तर संस्था बांधण्यात येणार आहेत.