कोणालाच विश्वासात न घेतल्याचा जि.पं.सदस्या सरस्वती पाटील यांचा आरोप
प्रतिनिधी/ बेळगाव
कोणतेही काम करताना त्याचा आराखडा तयार करणे महत्त्वाचे आहे. आराखडा तयार करून तो लोकप्रतिनिधींसह ग्राम पंचायतीला दिला पाहिजे. 2016 ला रुर्बन योजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, आजतागायत रुर्बनमधील कामांचा आराखडा अभियंत्यांनी आणि अधिकाऱयांनी कोणालाच दाखविला नाही. त्यामुळे नेमके काय चालले आहे, हे समजणे अवघड आहे. याबाबत जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी विचारले असता मंत्र्यांसह अधिकाऱयांचीही बोलती बंद झाली. केवळ थातुरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न या साऱयांनीच केला. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रुर्बन योजनेमध्ये समावेश असलेल्या गावांच्या कामांबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हा पंचायतीच्या सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. मात्र, रुर्बनमधील कामांचे नियोजनच अधिकाऱयांनी केले नाही. त्यामुळे रुर्बन असलेल्या गावांचा विकास झालाच नाही, असा आरोप पुराव्यानिशी सरस्वती पाटील यांनी केला. प्रत्येक प्रश्न अत्यंत अभ्यासपूर्वक सरस्वती पाटील यांनी मांडल्यामुळे अधिकाऱयांना घाम फुटला. त्यांना उत्तरेच देता आली नाहीत. त्यामुळे आता वरि÷ अधिकाऱयांनी या योजनेच्या कामांबाबत चौकशी करणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुदुक, आंबेवाडी, मंडोळी या चार गावांचा रुर्बन योजनेत समावेश करण्यात आला आहे. स्मार्ट शहराप्रमाणे स्मार्ट व्हिलेज ही योजना आहे. मात्र स्मार्ट होणेच अवघड बनले आहे. कारण अधिकाऱयांनी ग्राम पंचायत, तालुका पंचायत सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य, आमदार आणि मंत्र्यांनाही या कामांबाबतचा आराखडा किंवा नियोजन कधीच दाखविले नाही. कंग्राळी खुर्द येथे विहिरींना आरओ प्लान्ट बसवावेत, अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी केली.
प्रथम रस्ते करायचे, त्यानंतर गटारी करायच्या हे योग्य आहे का? असा प्रश्न करण्यात आला. रस्ता झाल्यानंतर पाण्याचे पाईप घातले जातात. त्यामुळे केलेले रस्तेही खराब होत आहेत. अशीच अवस्था राहिल्यास रुर्बनमधील सर्व निधी वाया जाणार, अशी भीती जिल्हा पंचायत सदस्यांनी यावेळी व्यक्त केली. स्मार्ट बसस्थानक बनविण्यात आले. त्यासाठी 10 लाखाचा निधी उपलब्ध होता. त्या निधीमध्ये स्मार्ट बसथांबा बांधणे अवघड असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. यावर हवे तर आम्ही ग्राम पंचायतमधून निधी दिला असता. तुम्ही आम्हाला त्यावेळी या गोष्टी का सांगितल्या नाहीत, असे सांगून अधिकाऱयांना धारेवर धरण्यात आले.
सोलार पथदीप उभारण्यात आले आहेत. मात्र, त्यातील बहुसंख्य पथदीप बंद आहेत. याला जबाबदार कोण? या गावांना स्वच्छ पाणी कधी मिळणार? असे प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आले. एकूणच रुर्बन योजनेतील काम योग्य प्रकारे नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यावेळी उपस्थित होते. मात्र त्यांनी अधिकाऱयांना याबाबत जाब विचारला नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. या बैठकीला जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, उपाध्यक्ष अरुण कटांबळे, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र के. व्ही., जि. पं. सदस्या माधुरी हेगडे यांच्यासह ग्राम पंचायत अध्यक्ष, पीडीओ व इतर अधिकारी उपस्थित होते.
रिक्षा वितरणाबाबत नाराजी
गावांतील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी सुरू करण्यात येणार आहे. काही गावांना यापूर्वी घंटागाडी देण्यात आली. आणखी तीन रिक्षा बुधवारी उपलब्ध करून त्याचे उद्घाटन रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या रिक्षा बेळगाव तालुक्मयातील गावांना देण्याऐवजी इतर ठिकाणीच दिल्या गेल्याने काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.