3 लाख रोपांची होणार लागवड : गतवषीच्या तुलनेत रोपलागवडीची संख्या घटली : दमदार पावसाने जमिनीत पुरेसा ओलावा : शेतकऱयांना सवलतीच्या दरात उपलब्ध
प्रतिनिधी / बेळगाव
पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी, वन्य जीवांच्या संरक्षणासाठी वनखात्यातर्फे दरवषी मोठय़ा प्रमाणात रोपलागवड केली जाते. मागील काही दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असल्याने जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे वनखात्याने बेळगाव विभागात रोप लागवडीला प्रारंभ केला आहे. गेल्या चार दिवसांपासून बेळगाव विभागासह खानापूर, बैलहोंगल, हुक्केरी, गोकाकमधील काही भागात रोप लागवडीचे काम हाती घेण्यात आले आहे.
वनखात्यातर्फे दरवषी लाखो रोपांची लागवड केली जाते. मात्र वाढते पर्यटन व विकास कामासाठी मोठय़ा प्रमाणात जंगलतोड होते. त्यामुळे झपाटय़ाने झाडांच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. याचा परिणाम म्हणजे प्रदूषण वाढत आहे. वाढती जंगलतोड व वन्यजीव संघर्ष अशा आव्हानांना तोंड देत वृक्ष लागवड हाती घेण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात 329 हेक्टरमध्ये तब्बल 3 लाख 6 हजार 400 रोपे लावण्यात येणार आहेत. मागील वषीच्या तुलनेत यंदा रोप लागवडीच्या प्रमाणात घट झाली आहे. याबरोबर खरीप हंगामासाठी शेतकऱयांना विविध जातींची 1 लाख रोपे सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहेत.
वनक्षेत्राबरोबर शहर व ग्रामीण भागातील जुनाट झाडे तोडलेल्या ठिकाणी, सरकारी जागेत, खुल्या जागेत, राज्य मार्ग व इतर ठिकाणी लागवड केली जात आहे. बेळगाव विभागात मच्छे, हलभावी, होसकोटी, शिरूर, खानापूर तालुक्मयातील ओतोळी, सावरगाळी, कणकुंबी, लोंढा, नागरगाळी, गोल्याळी आदी ठिकाणी असलेल्या नर्सरीतून रोपांची निर्मिती करून तेथूनच विविध ठिकाणी ही रोपे पुरविली जात आहेत.
जिल्हय़ात सर्वाधिक वनक्षेत्र हे खानापूर तालुक्मयात असून या विभागातील जांबोटी, लोंढा, नागरगाळी, गोल्याळी आदी वन्यक्षेत्रात लागवडीला सुरुवात करण्यात आली आहे. विशेषकरून बांबू, सागवान, बाभूळ, गुलमोहोर, फणस, सिसम, जांभूळ आदी प्रकारच्या रोपांची लागवड केली जात आहे. गतवषी झालेल्या जोरदार पावसाने बरीच रोपे नष्ट झाली होती. त्या ठिकाणीदेखील नवीन रोपे लावण्यात येत आहेत. रोप लागवडीबरोबर रोपांची विशेष काळजी घेतली जात असून झाडाभोवती लोखंडी व बांबूचे कुंपण घातले जात आहे.