जंगलांबाबत आस्था आणि जंगलतोडीमुळे होणाऱया हवामानातील बदलांबद्दल चिंता वाटत असणाऱयांना जागतिक पातळीवर व्यासपीठ मिळावे. यासाठी 1971 मध्ये ’युरोपियन कॉन्फीडरेशन ऑफ ऍग्रीकल्चर’ च्या बैठकीत हा दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. ’वनांचे महत्व व संवर्धन’ याविषयी जनजागृती करण्यासाठी 21 मार्चला दरवषी जागतिक वन दिन साजरा केला जाऊ लागला. या दिनानिमित्त जंगलांसंदर्भातील उत्पादन, संरक्षण व रंजकता या तीन महत्वाच्या घटकांबाबत जनजागृती केली जाते.
शुद्ध हवा, पिण्याचे पाणी आणि इतरही अनेक बाबी आपल्याला मिळतात त्या जंगलांमुळेच. मात्र चंगळवादी जीवनशैलीसाठी केल्या जाणाऱया बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे 1970 च्या दशकात जाणवू लागले. जंगली जनावरे, मानव आणि पर्यावरण कल्याणासाठी जंगलांची आवश्यकता आहे. वनस्पती कापणे प्रक्रिया नैसर्गिक कार्बन सायकल आणि दिवस दररोज वातावरणमध्ये त्याचे स्तर वाढत आहे.
पर्यावरणातून सीओ 2 गॅसचा वापर करण्यासाठी तसेच वातावरणातील अन्य प्रदूषके काढून टाकण्यासाठी वनसंसार हा उत्तम माध्यम आहे आणि त्यामुळे वातावरणाचा ताजेपणा कायम राखला जातो.
योग्य पाऊस, औषधे मिळवणे, ताजी हवा, वायू प्रदूषण काढून टाकणे, लाकूड मिळवणे इत्यादिकरिता जंगलांची फारच आवश्यकता आहे. जेव्हा आपण झाडांना कापतो, तेव्हा ते सर्व चक्रांना प्रभावित करते आणि मानवी जीवनावर परिणाम करते.
वनस्पतीविना जमिनीवर पाऊस शक्मय नाही, ताजी हवा, प्राणी नाही, छाया नाहीत, लाकूड नाही आणि औषधे नाहीत. सर्वत्र फक्त गरम, उबदार, दुष्काळ, पूर, वादळ, कार्बन डायऑक्साइड वायू, मिथेन, इतर विषारी वायू, हिवाळा आणि पावसाळा नसेल तर केवळ उन्हाळी हंगाम असेल. जंगलतोड टाळण्यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे.
दृष्टीआड सृष्टी’ असे आपण नेहमीच ऐकत असतो. पण या सृष्टीच्या आड असे काय आहे? जे आपल्याला दिसत नाही. अशा कितीतरी गोष्टी या सृष्टीची चपे फिरवत असतात. यामध्ये दगड, माती, हवा, पाणी असे निर्जीव घटक आहेत. त्याचप्रमाणे झाडे-किडे, माणूस-प्राणी, साप-मासे असे विविध सजीवही आहेत. या सर्वांच्या अनुकूल-प्रतिकूल सहबंधाने शतकानुशतके पृथ्वीचा इतिहास लिहिला जात आहे. या सर्व सजीव-निर्जीव गोष्टींचा प्रभाव एकमेकांवर पडत असतो; त्याचप्रमाणे यांच्या पूरक वापराने एकूणच जीवसृष्टीचे संवर्धनही होत असते.
माणूस हा निसर्गाचा वैरी नसून त्याच्याच मदतीने निसर्गाचे जतन व संवर्धन होऊ शकते. जंगलांतून मिळणाऱया संसाधनांचा मानवाच्या उपजीविकेशी थेट संबंध आहे. 2002 साली जंगल संवर्धनासाठी जैवविविधता कायदा मंजूर झाला. सामूहिक वनहक्क कायदा आला.
आदिवासींचे व इतर परंपरेने राहणाऱया आणि जंगलांचे संवर्धन करणाऱया वननिवासी यांचे जंगलावरील हक्क याला मंजूरी देण्यात आली. आणि याच कायद्यांचा व इतर शासकीय योजनांचा आधार घेत गावांमध्ये बदल घडू लागले. जसा वनांवरील हक्क लोकांना मिळत आहे तसेच जंगल संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारीही लोकांकडे आहे. ज्या भागांत वनव्यवस्थापन समिती नाही किंवा नुसतीच कागदोपत्री आहे अशा काही गावांतून लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे, पण, बेजबाबदारपणामुळे त्यावर नियंत्रण नाही. यातून जंगलांचा नाशच जास्त होत आहे व नको त्या वाईट प्रवृत्ती बोकाळत आहे. यासाठी संतुलित, शाश्वत, जबाबदार लोकसहभागातून होणाऱया वनव्यवस्थापनातूनच शाश्वत उपजीविका निर्माण होईल व सर्वांनाच ‘शुद्ध हवा आणि शुद्ध आरोग्य’ अनुभवता येईल.