प्रतिनिधी/ रत्नागिरी
संचारबंदीच्या कालावधीत विनाकारण फिरणाऱया वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आह़े 15 एप्रिल 2021 पासून जिल्हाभरात सुमारे 5 लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आह़े तर मास्क नसलेल्या 296 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आह़े त्यांच्याकडून 1 लाख 51 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आल़ा
राज्य शासनाकडून लॉकडाऊनसंदर्भात कडक नियमावली तयार करण्यात आली आह़े जिह्यातही महसूल व पोलीस यंत्रणेकडून संचारबंदीची अंमलबजावणी जोरात सुरू आह़े अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण फिरणाऱयांविरोधात जोरदार मोहीम पोलिसांकडून सुरू करण्यात आली आह़े संचारबंदी लागू केल्यानंतर 5 हजाराहून अधिक वाहने पोलिसांकडून तपासण्यात आल़ी पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱया 6 जणांची वाहने जप्त करण्यात आली आहेत़ तर एकावर कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े संचारबंदीची अंमलबजावणी कडक व्हावी, यासाठी पोलीस अधीक्षक ड़ॉ मोहितकुमार गर्ग हे पोलीस कर्मचाऱयांना मार्गदर्शन करत असल्याचे दिसत होत़े