बेळगाव / प्रतिनिधी
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापिठाच्या वतीने (व्हीटीयू) यंदा आपल्या पदवीदान समारंभात पदवी स्विकारणाऱया विद्यार्थ्यांना ‘गाऊन’ पासून सुटका देण्यात आली आहे. यापुढे विद्यार्थ्यांना हातमाग आणि यंत्रमागाद्वारे विणलेले ठराविक कपडे परिधान करून पदवी स्विकारावी लागणार आहे. व्हीटीयूचा पदवीदान समारंभ येत्या दि. 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या समारंभात पदवी स्विकारणाऱया सर्व विद्यार्थ्यांना या नव्या डेस कोडबाबत आदेश देण्यात आला आहे.
सध्या गाऊन घालायची पाश्चात्य संस्कृती असून, या संस्कृतीपासून विद्यार्थ्यांना मुक्त करण्याच्या दिशेने विद्यापिठाने पाऊल उचलले आहे. पदवीदान समारंभात केवळ मान्यवरांनाच गाऊन घालण्याची परवानगी विद्यापिठाने देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हातमागाद्वारे तयार असणारेच हे गाऊन असणार आहेत. यासाठी कंत्राटही देण्यात आले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळुन 70 वर्षाहुन अधिक काळ लोटला आहे. मात्र आजही बहुसंख्य विद्यापिठात गाऊन आणि ब्लॅक कॅप घालण्याची पाश्चात संस्कृती रूढ आहे. बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापिठ, धारवाड येथील कर्नाटक विद्यापिठ, कृषि विद्यापिठ यासह राज्यातील बहुतेक विद्यापिठात आजही हीच जुनी परंपरा आहे. हंपी येथील कन्नड विद्यापिठ आणि म्हैसुरच्या संस्कृत विद्यापिठात मात्र या संस्कृतीला फाटा देण्यात आला आहे.
जुन्या परंपरेनुसार पदवी, पीएचडी विद्यार्थ्यांना काळय़ा रंगाचा गाऊन आणि डोक्मयावर काळय़ा रंगाची कॅप अशा पेहराव्यात पदवीदान समारंभात पदवी स्विकारावी लागत आहे. तर व्यासपिठावरील मान्यवरही याच वेशात विद्यार्थ्यांना पदवीदान करण्याची परंपरा आहे. भारतीय संस्कृती दृढ करण्यासाठी केंद्रीय विद्यापिठ अनुदान आयोगाने या आधिच आदेश दिला आहे. या अन्वये व्हीटीयूच्या वतीने यावर्षापासून पदवीदान समारंभात हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागावर तयार झालेल्या कापडापासुन पांढऱया रंगाचा शर्ट आणि पॅन्ट असा विद्यार्थ्यांचा पेहराव राहणार आहे. तर विद्यार्थीनींना पांढरी साडी किंवा चुडीदार असा पेहराव राहणार आहे. पदवीदान समारंभात ब्लॅक कॅप घालण्याच्या परंपरेस व्हीटीयूने या आधिच फाटा दिला आहे. यामुळे येत्या फेब्रुवारीत होणाऱया व्हीटीयूच्या पदवीदान समारंभात वेगळे चित्र दिसुन येणार आहे.