प्रतिनिधी/ बेळगाव
बाजारपेठेसह शहरातील विविध रस्त्यांवर भटक्मया जनावरांची संख्या वाढत आहे. या जनावरांचा त्रास व्यावसायिकांसह वाहनधारकांनाही होत आहे. त्यामुळे भटकी जनावरे पकडण्याची मोहीम महापालिकेकडून राबविण्यात येत आहे. राज्यपालांच्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ही मोहीम राबवून विविध ठिकाणी भटकी जनावरे पकडण्यात आली.
विविध चौक, प्रमुख मार्ग आणि बसथांब्यांवर ठाण मांडून बसणाऱया भटक्मया जनावरांचा उपद्रव वाढला आहे. जनावरे पकडण्याची कारवाई वारंवार राबवूनदेखील जनावरांची संख्या कमी झाली नाही. दररोज ठिकठिकाणी 10 ते 15 जनावरांचा कळप फिरत असतो. धर्मवीर संभाजी चौकातील बसथांब्यावर सायंकाळनंतर भटकी जनावरे बसतात. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. जनावरांमुळे भाजीविपेते व व्यावसायिकांना फटका बसत आहे. रस्त्यावर फिरणाऱया जनावरांचा त्रास वाहनधारकांना होत आहे. त्यामुळे भटकी जनावरे पकडण्याची मागणी होत आहे. ही कारवाई महापालिकेच्यावतीने अधुनमधून राबविण्यात येते. रस्त्यांवर फिरणारी जनावरे पकडून गो-शाळेत दाखल करण्यात येतात. राज्यपालांच्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्य मार्गांवर फिरणारी जनावरे पकडण्याची कार्यवाही करण्यात आली.
सायंकाळी 6 नंतर फिरणाऱया जनावरांवर कारवाई कोण करणार?
महापालिकेकडून जनावरे पकडण्याची कार्यवाही सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कार्यालयीन कामकाजावेळी करण्यात येते. मात्र सायंकाळनंतर फिरणाऱया जनावरांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. सायंकाळी 6 नंतर धर्मवीर संभाजी चौकातील बसथांब्यावर 20 ते 25 जनावरांचा कळप आश्रय घेतलेला असतो. हा बसथांबा जणू भटक्मया जनावरांसाठीच अशी परिस्थिती निर्माण होते. बस प्रवाशांऐवजी भटकी जनावरे बसथांब्यावर ठाण मांडत आहेत. शेणामुळे संपूर्ण बसथांब्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे कार्यालयीन वेळेनंतर फिरणाऱया भटक्मया जनावरांवर कारवाई कोण करणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. सदर भाग कॅन्टोन्मेंट हद्दीत येत असल्याने महापालिकेकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. सदर जनावरे कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांची असल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डकडून कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे बस प्रवाशांना उपद्रव ठरणाऱया भटक्मया जनावरांचा बंदोबस्त कोण करणार, अशी विचारणा होत आहे..