प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात कोरोना पूर्णपणे आता आटोक्यात येत चालला आहे. सलग आठ दिवस कोरोना रूग्णवाढीचा दर हा सरासरी 12 ते 16 असा झाला आहे. मंगळवारी नवीन 16 रूग्ण जिल्ह्यात वाढले आहेत. तर 31 कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका क्षेत्रात तीन वाढले तर ग्रामीण भागात 13 रूग्ण वाढले आहेत. मंगळवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात कोरोना वाढीचा वेग घटल्याने सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी जिल्ह्यात नवीन 16 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये महापालिका क्षेत्रात नवीन तीन रूग्ण वाढले आहेत. सांगली शहरात दोन आणि मिरज शहरात एक रूग्ण वाढला आहे. आजअखेर महापालिका क्षेत्रात 16 हजार 422 रूग्ण बाधित झाले आहेत. त्यातील 96 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. ग्रामीण भागात 13 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात दोन आणि कडेगाव तालुक्यात दोन रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात तीन आणि पलूस तालुक्यात एक रूग्ण वाढला आहे. तासगाव तालुक्यात दोन तर शिराळा तालुक्यात एक आणि जत तालुक्यात दोन रूग्ण वाढले आहेत.
कवठेमहांकाळ, मिरज आणि वाळवा या तीन तालुक्यात नवीन एकही रूग्ण वाढला नाही. मंगळवारी जिल्ह्यात एकही मृत्यूची नोंद झाली नाही. हा जिल्ह्यासाठी दिलासा देणारी गोष्ट आहे. आजअखेर जिल्ह्यात एक हजार 727 रूग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर हा 3.65 टक्के इतका आहे. हा मृत्यूदर राज्यापेक्षा अधिक आहे. मंगळवारी उपचार सुरू असणारे 31 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्ह्यात 45 हजार 483 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हाचा रिकव्हरी रेट 96 टक्केपेक्षा अधिक झाला आहे.
नवे रूग्ण 16
उपचारात 208
बरे झालेले 45483
एकूण 47418
मृत्यू 1727