प्रतिनिधी / भिलवडी
कृष्णेला महापूर येऊन महीना झाले तरी तत्काळ मदत अद्याप पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा झाली नाही . अनेकांना रेशनींगचे धान्य ही मिळाले नाही . यामुळे भिलवडीतील पूरग्रस्त चिंताग्रस्त आहेत . अनेक ग्रामस्थ दैनंदीन बँकेत जाऊन पैसे जमा झालेत की नाही याची खात्री करीत आहेत . परंतु भिलवडी गावचे पैसे काही जमा होत नाहीत . शासनांने तत्काळ मदत देण्याचे आश्वासन दिले होते .परंतु महीना होत आला तरी तत्काळ मदतीचा पत्ता नाही . यामुळे पूरग्रस्त महा विकास आघाडी सरकारवर तिव्र नाराजी व्यक्त करी आहेत.
कृष्णेच्या महापूरात पूरग्रस्तांचे मोठे नुकसान झाले. अनेकांची घरे उद्धवस्थ झाली . शेतीचे आतोनात नुकसान झाले . व्यापारी वर्गाचे नुकसान झाले . यामध्ये पूरग्रस्तांचे आश्रु पुसण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधीपक्ष नेत्यांसह अनेक मंत्र्यांनी कृष्णाकाठाचा दौरा केला .परंतु अदयाप कसलीच मदत पूरग्रस्तांच्या हातात मिळालेली नाही . यामुळे भिलवडीतील पूरग्रस्त संभ्रमात आहे . मागील २०१९ च्या पूर काळात भाजपा सरकारने केलेली मदत ही तत्काळ मिळाली शिवाय जाचक अटी विना मदत मिळाली परंतु या वर्षीच्या पूरग्रस्तांना अनेक जाचक अटीचा सामना करीत मदत मिळवावी लागत आहे . या जाचक अटीमुळे अनेक कुंटूबे मदती पासून वंचित राहण्याजोगे आहे.
पलूस तालुक्यातील अनेक गावात घर पडझडीचे व व्यापारी वर्गांचे अद्याप पंचनामे सुरु आहेत . हे पंचनामे केंव्हा पुर्ण होणार नंतर त्यांचे व्हॉलीवेशन होऊन संगणकावर यादी तयार होणार नंतरच बँकेत पैसे जमा होणार या प्रक्रियेस अनेक दिवस लागणार या नंतर पूरग्रस्तांच्या खात्यावर पैसे जमा होणार. जसे सानुग्र अनुदान मिळण्यास महीना लागतोय तसेच व्यापारी आणि घरपडझडीचे शेतीचे आणि गोठा याला ही महीना लागेल असा अंदाज व्यक्त होत आहे .कोरोना आणि महापूर या मुळे संपुर्ण कृष्णाकाठ आर्थिक संकटात सापडला आसताना मात्र सरकार भिलवडीतील पूरग्रस्तांच्या कडे दुर्लक्ष करीत असल्यासारखे झाले आहे.