प्रतिनिधी / सातारा :
शालेय शिक्षण घेत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जिवनातील अत्त्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता 10 वी ची परिक्षा. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र परिक्षा -2021 आयोजित लेखी परिक्षा रद्द करण्यात आली होती. यंदाचा दहावीचा निकाल हा मूल्यपानाच्या आधारावर जाहीर करण्यात आला. यंदा सातारा जिल्ह्याचा निकाल हा 99.92 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे मुलींचा निकाल 100 टक्के लागला असून, जिल्ह्यातील सर्वच विद्यार्थीनी या इयत्ता 10 वी उत्तीर्ण झाल्या आहे.
यंदाची 10 वी परिक्षा ही 9 वी चा अंतिम निकाल, इयत्ता 10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापन व इयत्ता 10 वीची अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन आदींच्या आधारावर सदर निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांची विषयनिहाय संपादणूक माध्यमिक शाळांतर्फे निश्चित करण्यात आला आहे. सदर मूल्यमापन वस्तुनिष्ठ होण्यासाठी शाळा स्तरावर शासन निर्णयानुसार निकाल समितीचे गठन करून त्यांना विषय शिक्षक व वर्ग शिक्षक यांनी केलेल्या मूल्यमापनाची परीक्षण व नियमन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
यंदा सातारा जिल्ह्यात 40 हजार 166 व 1501 रिपिटर अशा एकुण 41,667 विद्यार्थ्यांनी परिक्षेचा फॉर्म भरला होता. त्यापैकी 40,134 विद्यार्थी हे यंदा उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 2.28 इतकी निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळ, कोल्हापुरचे सचिव देविदास कुलाळ व सातारा शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली आहे.
वर्गनिहाय नोंदणीकृत विद्यार्थी मुल्यांकन प्राप्त विद्यार्थी
उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी
मुले
21405
21404
21373
99.85
मुली
18761
18761
18761
100