ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जगातील सामर्थ्यशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर पडला आहे. आशिया पॉवर इंडेक्स फॉर 2020 या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
सिडनीमधील लोवी इन्स्टिट्यूटने हा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार सामर्थ्यशाली म्हणजेच मेजर पॉवर हा दर्जा भारताने गमावला आहे. 40 पेक्षा जास्त गुण असणाऱ्या देशांचा जगातील सामर्थ्यशाली देशांच्या यादीत समावेश होतो. भारताला यावर्षी 39.7 टक्के गुण मिळाले. मागील वर्षी भारताला 41 टक्के गुण मिळाले होते.
कोरोनामुळे भारताच्या आर्थिक आणि आरोग्य स्तरावर परिणाम होऊन विकासदर मंदावला आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.दरम्यान, आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये भारत हा अमेरिका, चीन आणि जपाननंतर चौथा सर्वात प्रभावशाली देश ठरला आहे.