वार्षिक सर्वसाधरण सभा खेळीमेळीत , कृषी प्रदर्शन व पीक परिसंवादाला प्रतिसाद
वार्ताहर/ निपाणी
निपाणीसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱयांसाठी वरदान ठरलेल्या हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळी शनिवारी बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर असणाऱया सर्व विषयांवर सविस्तर चर्चा होताना सर्व विषयांबरोबरच कारखाना मल्टीस्टेट करण्याचा महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. यामुळे येत्या काळात कारखान्याच्या विस्तारीकरणाला विशेष अशी गती मिळणार असल्याचे दिसत असून ऊस उत्पादक शेतकरी सभासद आणि कर्मचारीवर्ग या सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने कारखाना कार्यस्थळी शनिवारी सकाळी ऊस उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शक ठरणारे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे कृषी तज्ञांचे मार्गदर्शन व्हावे व शेतकऱयांना ऊस उत्पादन वाढीची दिशा मिळावी हा उद्देश ठेवून कारखान्याच्यावतीने ऊसपीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कृषी तज्ञांनी शेतकऱयांना मार्गदर्शन केले. याचा बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांनी लाभ घेताना उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या मार्गदर्शनानंतर वार्षिक सर्वसाधरण सभेला मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला ज्ये÷ संचालक पप्पू पाटील यांनी स्वागत केले. तर कारखान्याचे कार्यकारी अधिकारी शिव कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करताना सर्वसाधारण सभेसमोर असणाऱया विषयांचे वाचन करून उपस्थित सभासदांकडून टाळय़ांच्या गजरात मंजुरी मिळवली. याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना चंद्रकांत कोठीवाले म्हणाले, खासदार आण्णासाहेब जोल्ले आणि मंत्री शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनानुसार कारखान्याने गेल्या तीन वर्षात प्रगतीकडे वाटचाल चालवली आहे. सन 2020-21 या गळीत हंगामात 121 दिवस कारखाना चालला. यामध्ये 4 लाख 34 हजार 710 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 11.85 टक्के उतारानुसार 5 लाख 15 हजार 300 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. 15 मेगावॅटसह विद्युत घटकांमध्ये 9.36 कोटीचे उत्पादन मिळाले आहे. यंदाच्या गळीत हंगामात 5 लाख मेट्रीक टन उसाचे गाळपाचे ध्येय आहे.
चंद्रकांत कोठीवाले पुढे म्हणाले, खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी कारखाना बंद पडण्याच्या अवस्थेत असताना मोठय़ा धाडसाने बिरेश्वर संस्थेच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ दिले. त्याचबरोबर कारखाना ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी मार्गदर्शन केले. यामुळेच कारखाना प्रगती पथाकडे वाटचाल करत आहे. यंदाही इतर कारखान्यांप्रमाणेच एफआरपीनुसार योग्य ऊसदर देण्यासाठी कारखाना कटिबद्ध आहे. यासाठी ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे. गळीत उद्दिष्ठ साध्य होऊन साखर उत्पादनात वाढ झाल्यास कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होऊन कारखान्याच्या प्रगतीला आणि सहाजिकच शेतकऱयांच्या विकासालाही अधिकची गती प्राप्त होणार आहे, असे सांगितले.
याप्रसंगी बोलताना खासदार आण्णासाहेब जोल्ले म्हणाले, हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना हा परिसरातील सर्वांसाठी एक आधार आहे. पण हा कारखाना उत्पन्नाविना वाढलेल्या कर्जातून बंद पडण्याच्या अवस्थेत आला होता. अशा परिस्थितीत हा कारखाना टिकविण्यासाठी सर्वांचेच सहकार्य मिळत गेले. उत्पन्नाचे स्त्राsत वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सध्या सुरू आहे आणि त्यात यश देखील येत आहे. मोलॅसिस उत्पादन वाढवण्यासाठी नव्याने टँक उभारण्यात आली आहे. बिगर हंगामात मोलॅसिसचा भाव वाढतो. यामुळे याचे उत्पन्न देखील 2.40 कोटी वाढले आहे. येत्या दिवसात इथेनॉल प्रकल्प उभा करून कारखाना आर्थिक समृद्ध बनवण्यात येईल, असे सांगितले.
मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, संस्थापक संचालकांनी परिसरातील शेतकऱयांच्या विकासाची दूरदृष्टी ठेवून हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना उभा केला. त्यांनी पाहिलेले स्वप्न सध्या सत्यात उतरू लागले आहेत. असा अनुभव सर्वांनाच येत आहे. यावेळची वार्षिक सर्वसाधारण सभा याची प्रचितीच म्हणावी लागेल. सहकार हे जीवन आहे सहकार समाज जीवन यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे माध्यम आहे, असे सांगितले. यावेळी अपघाती निधन झालेल्या कारखाना कर्मचाऱयांच्या वारसदारांना मान्यवरांच्या हस्ते निधीचे वितरण करण्यात आले. उपस्थित सभासद आणि कार्यकर्त्यांनी मंत्री शशिकला जोल्ले यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन करताना शुभेच्छांचा वर्षाव केला.