एका तलावाच्या काम पूर्णत्वाकडे तर अनेक तलावाचे काम घेणार हाती
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव तालुक्यातील विविध भागांमध्ये पाणी अडविण्याच्या दृष्टिने आता मोठय़ा प्रमाणात पाऊल उचलण्यात येत आहे. परिणामी अनेक तलावांची खोदाई करुन त्यामध्ये पाणी साठविण्याचे काम करण्याची धडपड सुरु आहे. त्यामुळे जलपातळीत वाढ होत असून याचा लाभ शेतकऱयांना व नागरिकांना होणार यात शंका नाही. मात्र आता हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहाच्या कार्यक्षेत्रातही दोन तलावांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. एका तलावाचे काम पूर्णत्वाकडे आले असून दुसऱया तलाव खोदाई करण्यासाठी सर्व्हे करण्यात आला आहे. त्यामुळे याचा फायदा जेलमधील कैद्यांबरोबरच इतरांनाही होणार आहे.
एकीकडे पाणी पातळी घटत चालली असून ही समस्या भविष्यात धोका निर्माण करणारी आहे. यासाठी अनेक शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सरकारने विविध योजना राबवून पाणी जमिनीत कसे झिरपता येईल यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. कोटय़ावधी लीटर पाणी वाया जात आहे. त्याचे संगोपन करुन त्याचाउपयोग सर्वसामान्यांना कसा होईल, याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत आहे. दरम्यान बेळगाव तालुक्मयात मात्र पाणी जिरविण्यासाठी विविध तलावांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या तालुक्मयात 42 तलावांची निर्मिती करण्याचा ध्येय तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी ठेवले आहे. त्या अनुषंगाने आता हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात दोन तलावांची निर्मिती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तर अजूनही त्या ठिकाणी काही तलावांची निर्मित येत्याकाळात करुन त्याचा उपयोग नागरिकांना व जेलमधील कैद्यांना करुन देण्याचे त्यांनी सांगितले.
पाण्यासाठी अनेक गावांमध्ये भटकंती करावी लागते आणि लागत आहे. मात्र त्यावर आळा आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी बेळगाव तालुक्मयात जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. विविध ठिकाणी उद्योग खात्रीची जोड देत तलावांची निर्मिती करुन त्यामध्ये पाणीसाठा कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही योजना राबविली होती. मात्र याकडे अधिकारी आणि नागरिकांच्या असहकार्यामुळे ही योजना बारगळली होती. आता उद्योग खात्रीची जोड देत तलवांच्या खोदाईची कामे करण्यात येत आहेत.
कारागृहातील जनावरांना व इतर कामांसाठी होणार उपयोग
याबाबत तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या तलावांतील पाणी प्रामुख्याने कारागृहातील जनावरे व इतर कामांसाठी होणार आहे. याचबरोबर परिसरातील शेतकऱयांनाही होणार असून जमिनीत अधिकतर पाणी झिरपावे या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे या तलावांचे काम पूर्ण होईल, असे सांगितले.