वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या भारताची अव्वल नेमबाज मनू भाकरने एअर इंडिया हवाई वाहतूक कंपनीच्या दोन कर्मचाऱयांविरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. हवाई प्रवासावेळी सदर कर्मचाऱयांनी आपला अपमान करून छळवणूक केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मनूची मागणी आहे. भोपाळ ते दिल्ली दरम्यानच्या हवाई प्रवासावेळी ही घटना घडली.
भारताचा अव्वल नेमबाज 19 वर्षीय मनु भाकरने राष्ट्रकुल स्पर्धा आणि युवा ऑलिंपिक स्पर्धेत पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक मिळविले आहे. शुक्रवारी मनू भाकरने भोपाळहून दिल्ली दरम्यान एअर इंडियाच्या विमानाने प्रवास केला होता. या वादंगाप्रकरणी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजु यांनी हस्तक्षेप केला. शिवाय, मनू अव्वल खेळाडू असल्याचा आवर्जून उल्लेख केला. दरम्यान, एअर इंडियाच्या कर्मचाऱयांकडून या बेशिस्त वर्तुवणूकीबद्दल एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे. एअर इंडिया कंपनीतील अधिकारी मनोज गुप्ता आणि एक सुरक्षा अधिकारी यांच्या वागणुकीमुळे हा वाद उदभवल्याचे संकेत आहेत. विमानतळावर उतरल्यानंतर एअर इंडियाच्या एका कर्मचाऱयाने भाकरच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. तसेच काही आवश्यक कागदपत्रांची मागणी केली होती, असे वृत्त आहे.