नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या आठव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱयांच्या खात्यात शुक्रवारी दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी, 14 मे रोजी सकाळी 11 वाजता शेतकऱयांशी चर्चा करणार असल्याची माहिती कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली. याप्रसंगी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱयांच्या खात्यामध्ये वर्ग करतील. नरेंद्र मोदी 10 कोटी शेतकऱयांच्या खात्यावर तब्बल 19 हजार कोटी रुपये वर्ग करतील. या योजनेंतर्गत शेतकऱयांना आतापर्यंत 7 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 14 हजार रुपये प्राप्त झाले आहेत. pmindiawebcast.nic.in किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून शेतकरी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवू शकतात.
केंद्र सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत आतापर्यंत 10 कोटीहून अधिक शेतकऱयांची नोंदणी झाली आहे. पहिल्यांदा 3 कोटी 16 लाख 05 हजार 539 शेतकऱयांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळाला. यापूर्वी डिसेंबरमध्ये जाहीर केलेला हप्ता 10 कोटी 70 हजार 978 शेतकऱयांना देण्यात आला होता. देशातील शेतकऱयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी या योजनेंतर्गत केंद्र सरकार दर आर्थिक वर्षात 6 हजार रुपये शेतकऱयांच्या खात्यावर पाठवते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱयांच्या खात्यात वर्ग केली जाते.