ऑनलाईन टीम / काठमांडू :
चीननंतर आता नेपाळही भारताविरोधात आक्रमक झाला असून, नेपाळने भारत-नेपाळ सीमा भागात हाती घेतलेल्या रस्ते बांधणीच्या कामाला आता वेग आला आहे.
नेपाळने धारचुला-टीनकर रस्त्याचे काम सध्या जलदगतीने सुरू केले आहे. हा रस्ता महाकाली कॉरिडोर म्हणून ओळखला जातो. हा रस्ता पूर्ण झाल्यास नेपाळला भारतावर अवलंबून रहावे लागणार नाही. 2008 मध्येच या रस्त्येबांधणीला परवानगी देण्यात आली होती. मात्र, हे काम अतिशय संथ गतीने सुरु होते.134 किलोमीटर रस्ता नियोजित आहे. मात्र, आतापर्यंत केवळ 43 किलोमीटरचा रस्ता बांधून झाला आहे. आता या अपुऱ्या रस्त्याचे काम जलदगतीने सुरू करण्यात आले आहे.
धारचुला-टीनकर हा रस्ता तयार झाल्यानंतर नेपाळी लोकांसह सैनिकांनाही याचा वापर करण्यात येईल. टीनकर पासून चीनची सीमा जवळ आहे. हा रस्ता बांधण्यासाठी नेपाळने सैन्य तैनात केले आहे. रस्ता बांधकामाचे साहित्य आणण्यासाठी तेथे हेलीपॅड बांधण्यात आले आहे. या सीमा भागात नेपाळी सैनिकांनी अनेक चेकपोस्टही तयार केले आहेत.