मात्र नियमांचे पालन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
प्रतिनिधी/ पणजी
पर्यटनाबाबतच्या सर्व गोष्टी अनलॉक अर्थात खुल्या करण्यात आल्या असून पाटर्य़ांमध्ये सामाजिक अंतराचे पालन केलेच पाहिजे तसेच पर्यटनामध्येही सामाजिक अंतर राखले पाहिजे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले आहे. गोव्यातील पर्यटन हळूहळू पूर्वपदावर येत असून सर्वांनी कोरोनाबाबत नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आल्तिनो येथील सरकारी निवासात झालेल्या एका खासगी कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुरगाव बंदरातील कोळसा वाहतूक प्रश्नावर पुन्हा एकदा बैठक घेऊन काहीतरी तोडगा काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.