प्रतिनिधी / कोल्हापूर
94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा नाशिकमध्ये होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या लोगोची निर्मिती कोल्हापूरमध्ये झाली आहे. ‘स्वच्छ भारत’चा लोगो ज्या अनंत खासबागदार यांनी केला. याच निर्मितीमध्ये अनंत खासबारदार, शिरीष खांडेकर आणि सर्व सहकाऱयांनी साहित्य संमेलनाच्या लोगोची निर्मिती देखील केली आहे. शुन्यातून निर्माण होणाऱया तीन रेषा आणि या रेषेतून घेतलेले वळण, या किनाऱयावरील लेखणी कोरोनाच्या निराशेतून बाहेर काढणारी संकल्पना या लोगोमध्ये आहे.
ग्रंथाच्या मध्यावर मराठी साहित्याच्या समतोलाचे प्रतीक लेखणीचा केशरी रंग, ‘परी अमृताते ही पैजा जिंके’ सांगणाऱया ज्ञानोबांच्या आणि आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने' म्हणणाऱया तुकोबांच्या संत परंपरेतून महाराष्ट्रात घडलेल्या सामाजिक क्रांतीचं आणि नव्या सुर्योदयाच्या क्षितिजाचे प्रतीक दर्शवतो. यातून दिसणारा सूर्योदय नवनवीन कल्पना साहित्य स्त्राsताचे प्रतीक आहे. मराठी साहित्य संस्कृतीचा हा सूर्य मराठी जनांच्या आशा आकांक्षांच्या नव्या प्रारंभाचे प्रतीक आहे. अग्रभागी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या कवितेतील 'अनंत आमुची ध्येयासक्ती' या ओळी घोषवाक्य म्हणून निवडल्या आहेत. परंतू कुसुमाग्रजांना अपेक्षीत आधुनिकता आणि नाविन्यतेचा यात समतोल साधला आहे. पंधरा दिवसापुर्वी नाशिकमध्ये लोगोसंदर्भात स्पर्धा झाल्या. या स्पर्धेसाठी आम्ही हा लोगो पाठवला होता. अनेक स्पर्धेतून या लोगोची निवड केली ही गोष्ट
निर्मिती’सह कोल्हापूरसाठी भुषणावह आहे.
लोगोचे वैशिष्ट्य
प्रतिभेच्या अवकाशातून निर्माण होणारे साहित्य हे अनंताकडून अनंताकडे प्रवाहित होणार आहे. त्याच्या निदर्शक डावीकडील प्रारंभाच्या रेषा आहेत. या रेषा वेगवेगळ्या स्तरांवरून येत ग्रंथाकडे प्रवासात जातात. मध्यभागी लेखनाचा महत्वाचा टप्पा आहे. ग्रंथ उलगडलेला दिसतोय तर अवकाशातून झरणारी लेखणी साहित्यातील समतोलाचे प्रतीक आहे. उजवीकडील पुस्तकाच्या पानातून गोदावरीचे चैतन्यदायी प्रवाह दिसत आहेत. अनंताकडून ग्रंथाकडे मी ग्रंथाकडून नदी प्रवाहाच्या माध्यमाद्वारे लोकसंस्कृती सामाजिक जाणिवा समृद्ध करत पुन्हा अनंताकडे जाणाऱया लाटा दर्शवतात.
कारोनानंतर निराशेतून बाहेर येणारे जग संकल्पना
लहानपणापासून मी साहित्याचा अभ्यासक आहे. कारोनानंतरचे जग निराशेतून कसे बाहेर येते ही संकल्पना घेवून मराठी साहित्य संमेलनाचा लोगो तयार केला आहे. हा लोगो मी आणि शिरीश खांडेकर आम्ही दोघांनी अभ्यास करून तयार केला आहे. स्वच्छ भारत अभियानाप्रमाणेच हा लोगोही लोकांच्या पसंदीला येईल याची खात्री आहे.
अनंत खासबारदार (निर्मिती ग्राफीक्स )