ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढतच आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी 11 लाखांचा टप्पा गाठला आहे. मागील 24 तासात राज्यात 23,365 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 474 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 11 लाख 21 हजार 221 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 30 हजार 883 एवढा आहे. त्यामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

बुधवारी दिवसभरात 17,559 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 7 लाख 92 हजार 832 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 लाख 97 हजार 125 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 70.71 % आहे. तर मृत्यू दर 2.75 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 55 लाख 06 हजार 276 नमुन्यांपैकी 11 लाख 21 हजार 221 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 17 लाख 53 हजार 347 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 36 हजार 462 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.