ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात मागील काही दिवसांपासून दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळे मोठा दिलासा मिळत आहे.

दरम्यान, मागील 24 तासात महाराष्ट्रात 47 हजार 371 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर 29, 911 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आजपर्यंत एकूण 50 लाख 26 हजार 308 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.43% इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 3 लाख 38 हजार 253 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात काल 738 जणांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.55 % एवढा आहे. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 21लाख 54 हजार 275 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54 लाख 97हजार 448 (17.9 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 29, 35, 409 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 21, 648 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत कालच्या दिवशी 1, 425 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर 1, 460 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 59 जणांनी आपला जीव गमावला. सद्य स्थितीत 29,525 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.